
Tej Police Times
राज्यात डाव्यांना सत्तेतून बाहेर खेचण्यासाठीच काँग्रेसनेच ‘तृणमूल’ला मोठे केले. मात्र, ममतादीदी काँग्रेसऐवजी भाजपला साथ देत आहेत, असे मेडिकल स्टोअर्सवाल्या माधव यांना वाटते. ‘‘डाव्या पक्षांनी अणू कराराच्या मुद्द्यावरून केंद्रातील तत्कालीन यूपीए-१ चे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी डाव्यांनी ‘घोडचूक’ केलीय असे वक्तव्य त्यावेळचे केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी यांनी केले होते’’, अशी आठवण ते सांगतात. ‘त्यानंतर राज्यात ममता बॅनर्जींचा उदय झाला. डाव्यांनी काँग्रेसच्या नेत्यांचे खून केले आहेत. आता डाव्यांना काँग्रेस लोकसभेसाठी पूर्ण सहकार्य करतील, याची कोणतीच हमी नाही.’ त्यामुळे काँग्रेस डाव्यांविरोधात ‘बी टीम’ म्हणून काम करतेय का?’ अशी शंका ते उपस्थित करतात. उलुबेरियामध्ये ‘तृणमूल’च्या उमेदवार मिताली बाग यांच्याविरोधात भाजपने प्रतिस्पर्धी ‘माकप’कडेच मदत मागितल्याची चर्चा आहे.
सर्व राजकीय तर्कवितर्कांमध्ये पाचवी पास आणि बांधकाम पर्यवेक्षक फिरोज याचे बोल वेगळे आहे. ‘‘भाजपने देशाची निराशा केली आहे. ममता लखिर भंडार योजना देताय पण राज्यात पेट्रोल, डिझेल एक रुपयाने सुद्धा त्यांनी स्वस्त केले नाही. हे तर त्यांना शक्य होते ना? राज्यात काँग्रेस-डावी आघाडी चांगला पर्याय होऊ शकते. पण त्यांना काम दाखवावे लागेल’’, असे तो स्पष्ट करतो.
Recover your password.
A password will be e-mailed to you.