
Tej Police Times
पूर्वेकडील राज्यांत मात्र गेल्या वर्षीच्या याच हंगामाच्या तुलनेत पाण्याची स्थिती बरी आहे. येथील जलाशयांमध्ये एकूण जलसाठा ६.५३१ बीसीएम आहे. तो त्यांच्या साठवण क्षमतेच्या ३१.९७ टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हे प्रमाण २८ टक्के होते.
हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान यांचा समावेश असलेल्या उत्तर भारतातील जलाशयांमध्ये एकूण साठवण क्षमतेच्या २९ टक्के म्हणजे ५.६१८ बीसीएम उपलब्ध पाणीसाठा आहे. वर्षापूर्वी याच जलाशयांत ३७ टक्के पाणी होते. तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांचा समावेश असलेल्या मध्य भारतात १५.९३८ बीसीएम उपलब्ध पाणीसाठा आहे. तो एकूण साठवण क्षमतेच्या ३३ टक्के आहे. मागील वर्षी याच कालावधीत येथे ४० टक्के पाणी होते. दक्षिण भारतातील जलाशयांमध्ये ७.४९४ बीसीएम पाण्याची उपलब्धता आहे ती एकूण साठवण क्षमतेच्या केवळ १४ टक्के आहे. मागील वर्षी हेच प्रमाण २६ टक्के होते.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! लवकरच होऊ शकते पाणीकपात, धरणांत एवढाच पाणीसाठा शिल्लक
राज्याला कोरड
महाराष्ट्रातील धरणे आणि सध्याचा पाणीसाठा (टक्के)
जायकवाडी २६
भीमा (उजनी) ०
मुळा ४७
दूधगंगा ५९
माणिकडोह ४०
भंडारदरा ४९
ऊरमोडी ११
भाटघर ५२
नीरा देवघर ४२
कन्हेर ४७
पानशेत (तानाजी सागर) ५८
Recover your password.
A password will be e-mailed to you.