तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Mantra For Children : सुट्टीत शिकवा मुलांना हे श्लोक, ज्ञान-बुद्धिसोबत वाढेल एकाग्रता; असे करा पाठ

0 36

संस्कृत श्लोक :
हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. सध्याचे जग स्पर्धात्मक आहे त्यामुळे आपल्याला मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. जग जितके वैज्ञानिकदृष्टीने पुढे जात तितकेच आध्यात्मिक दृष्टीनेही पुढे जात आहे. जीवनातील कोणत्याही अडचणींना समोरे जाण्यासाठी श्लोक आणि मंत्राचे नियमित पठण केल्याने फायदा होतो.

घरात अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मुले नोटीस करतात. त्यांसाठी पालकांनी मुलांना आध्यात्मिकतेची गोडी लावायला हवी. ज्यामुळे त्याच्या मानसिक संतुलनासोबतच स्मरणशक्ती देखील चांगली असेल. त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि बुद्धीत अधिक भर पाडण्यासाठी तुम्ही मुलांना काही मंत्र शिकवायला हवे जाणून घेऊया त्याबद्दल
Marriage Solution : वय वाढतंय, लग्न जुळत नाहीये? अडथळे येताय? ज्योतिषशास्त्रानुसार करा हे उपाय, मिळेल मनासारखा जोडीदार

1. ऊँ

ओम हा सर्वात सोपा मंत्र आहे. ओमच्या आदिम ध्वनीला परंपरेत मोठी शक्ती आणि महत्त्व आहे असे म्हटले जाते. ओमचा जप केल्याने मनाला आंतरिक शांती मिळते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना मनाला एकाग्र आणि लक्ष केंद्रित करण्यास अडथळा येत नाही. तसेच सकारात्मक ऊर्जा देखील प्राप्त होते.

2. महामृत्युंजय

ओम त्रयंबकम यजमाहे सुगंधीम् पुष्टी वर्धनम्, उर्वर रुकामेव बंधनं, मृत्युोर मोक्षिय ममृतात्।
या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि आंतरिक सामार्थ्याच्या बाबतीत जप करण्यासाठी सर्वात शक्तीशाली मंत्र म्हणून ओळखला जातो. भीती आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी, त्रास आणि कठीण परिस्थितीत या मंत्राचा जप करायला हवा.
Tuesday Astrology : मंगळवारी हनुमानाला करा या गोष्टी दान, विवाहातील अडचणी होतील दूर

3. गणेश मंत्र

ओम गं गणपतये नमः
श्री गणेशाला बुद्धीचा देवता म्हणून ओळखले जाते. तसेच तो संकट विनाशक आहे. त्यासाठी कोणत्याही कठीण प्रसंगी या मंत्राचा जप करुन विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक काळातील अडथळे दूर करण्यासाठी गणेशाचा आशीर्वाद घेतात. नियमितपणे याचे पठण केल्याने ज्ञानात भर पडते. तसेच बुद्धी तीक्ष्ण होते.

4. सरस्वती मंत्र

ओम महासरस्वते नम:
देवी सरस्वतीला ज्ञान आणि बुद्धीची देवी मानले जाते. शिक्षण क्षेत्रात यश हवे असेल तर ओम महासरस्वते नम: चा जप करावा. ज्यामुळे तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळतो.

5. गायत्री मंत्र

ओम भूर भुवः स्वाहा तत्सवितुर वरेणायम. भार्गो देवस्य धीमही, धियोर योना प्रचोदयात
गायत्री मंत्र हा ऋग्वेदातील स्त्रोत आहे. ज्यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी याचा जप केला जातो. अंधार आणि अज्ञान दूर करण्यासाठी या मंत्राचा नियमितपणे जप करावा.

टीप :
ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.