तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

पाचवा टप्पा झाला, भाजपचा सर्व्हे आला; महाराष्ट्रात नुकसान, आणखी कुठे कुठे फटका बसणार?

0 38

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान झालं आहे. राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर मतदान झालं आहे. या दोन टप्प्यांमध्ये एकूण ११४ जागा आहेत. पाच टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्षाकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे.

मोदी मॅजिकमुळे भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचा विश्वास नेते, पदाधिकाऱ्यांना आहे. मतदानाच्या पाचव्या टप्प्यानंतर भाजपनं सर्व राज्यांचे अहवाल, सर्वेक्षण संस्थांचे अहवाल आणि अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे मोठ्या विजयाचा दावा केला आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व राष्ट्रीय सरचिटणीसांसह ५ टप्प्यांतील मतदानाचा आढावा घेतला. त्याआधारेच भाजप मोठा विजय होईल असा दावा केला जात आहे. मतदान पार पडलेल्या राज्यांमधील नेते, उमेदवार दिल्ली गाठू लागले आहेत.
Kalyan Lok Sabha Election: अब की बार ५ लाख पार; CM पुत्राला गोळीबार महागात? शिंदेंचं ‘कल्याण’ भाजपची चिंता वाढवणार?
मोदींच्या करिश्म्यापुढे अन्य समीकरणं फोल ठरत असल्याचा भाजपचा दावा आहे. त्यामुळेच मोदी हॅट्ट्रिक करणार असल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. अमित शहादेखील पाचव्या टप्प्यानंतर एनडीएनं ३०० जागांचा टप्पा पार केल्याचं सभांमधून सांगत आहेत. पुढच्या दोन टप्प्यांमध्ये ११४ जागा आहेत. त्यांच्या व्यवस्थापनासाठी भाजपनं प्रत्येक मतदारसंघात एक ज्येष्ठ नेते, एक खासदार, राज्यातील ज्येष्ठ नेते आणि बाहेरुन १०० कार्यकर्ते पाठवले आहेत.

कुठे फायदा? कुठे फटका?
भाजप नेत्यांच्या अहवाल आणि मूल्यांकनानुसार पूर्व भारतात पक्षाची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपला फायदा होईल. तर महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणात पक्षाला फटका बसेल. या राज्यांत होणाऱ्या नुकसानाची भरपाई पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश, तेलंगणामधून होईल अशी चर्चा आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.