Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Budhwarche Upay : बुधवारी करा हे ५ उपाय, करिअर-व्यवसायातील अडथळे होतील दूर

8

Wednesday Astrology :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक दिवसाचे स्वत:चे असे विशेष स्थान आहे. बुधवार हा दिवस भगवान श्रीगणेशाला समर्पित आहे. बुध ग्रहाच्या नावावरुन बुधवार हे नाव ठेवले गेले आहे.

ज्यांच्या कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती कमजोर असेल त्यांनी काही उपाय अवश्य करावे. बुधाच्या अयोग्य स्थितीमुळे व्यक्तीला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यांना समोरे जावे लागते. ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे केल्याने श्रीगणेशाच्या आशीर्वादाने सर्व समस्या दूर होतात. तसेच कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती मजबूत होते. जाणून घेऊया या दिवशी कोणते उपाय करायला हवे.

1. दुर्गा देवीची उपासना

ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी दुर्गा देवीचे ध्यान करताना दुर्गा सप्तशीचे पठण करा. असे केल्याने जीवनात कोणत्याही प्रकाराची हानी होणार नाही. कुटुंबात सुख-शांती राहाते. दुर्गा देवी प्रसन्न झाल्याने आर्थिक समस्या सुटतात.

2. हिरवे मूग दान करा

बुधवारी हिरवे मूग दान करावे. तसेच या दिवशी हिरवे मूग खाणे शुभ मानले जाते. असे केल्याने कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती मजबूत होते. गणेश आणि लक्ष्मीची कृपा राहाते. बुधवारी शिवलिंगावर हरभरा अर्पण करा.

3. बुधवारी गणेश स्तोत्राचे पठण करा

आर्थिक अडचणी किंवा कर्जामुळे वैतागले असाल तर दर बुधवारी श्रीगणेश स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने श्रीगणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो. जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. श्रीगणेश स्तोत्राचे पठण केल्याने जीवनात हळूहळू सुख-समृद्घी येते. अनेक अडथळे दूर होतात.

4. श्रीगणेशाला या वस्तू अर्पण करा

दर बुधवारी श्रीगणेशाला शमीची पाने किंवा दुर्वा अर्पण करावा. शमीची पाने उपलब्ध नसल्यास दुर्वा अपर्ण करु शकता. २१ दुर्वा अर्पण केल्याने अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होतात. श्रीगणेश प्रसन्न होऊन आर्थिक चणचण दूर करतात.

5. गाईला चारा खाऊ घाला

बुधवारी गाईला हिरवे गवत किंवा चारा खाऊ घालावे. असे केल्याने देवांची कृपा होते. तसेच ग्रह दोषांमुळे होणारे दु:खही दूर होते. तीन महिने असे केल्याने इच्छित फलप्राप्ती होते. हिरवा चारा गाईला खाऊ घातल्याने आयुष्यातील संकटे हळूहळू दूर होतात.

टीप :
ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.