तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

काँग्रेसनेच घोटला लोकशाहीचा गळा; आणीबाणीवरुन मोदींचा आरोप, १९८४च्या दंगलीबाबत म्हणाले…

0 33

वृत्तसंस्था, होशियारपूर (पंजाब) : ‘आणीबाणीच्या काळात लोकशाहीचा गळा घोटणारे आणि १९८४च्या दंगलीत शीखांची हत्या झाली, तेव्हा त्याची पर्वा न करणारे काँग्रेस होते,’ असा आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काँग्रेसवर हल्ला चढवला. ‘दंगलीवेळी शीखांभोवती पेटते टायर टाकून त्यांना मारण्यात आले. त्या वेळी त्यांनी राज्यघटनेची पर्वा केली नव्हती,’ अशी टीका मोदी यांनी सात टप्प्यांच्या निवडणुकीतील शेवटच्या प्रचारसभेत केली.

होशियारपूरच्या भाजप उमेदवार अनिता सोम प्रकाश आणि आनंदपूर साहिबचे उमेदवार सुभाष शर्मा यांच्यासाठीच्या प्रचारसभेमध्ये मोंदी यांनी आरक्षण, भ्रष्टाचार आणि राम मंदिराच्या मुद्द्यांवर भाष्य केले. सत्तेत आल्यास भाजप राज्यघटना बदलेल, असा आरोप करणाऱ्या काँग्रेसला मोदींनी लक्ष्य केले. ‘आणीबाणीच्या काळात लोकशाहीचा गळा घाटणाऱ्या नेत्यांच्या तोंडून देशातील नागरिक राज्यघटनेबद्दल टोमणे ऐकत आहेत,’ असे ते म्हणाले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि ‘इंडिया’चे हेतू धोकादायक असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

‘गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात मी नेहमीच अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींच्या हिताचे, आरक्षणाचे संरक्षण केले आहे. मात्र, माझ्या या प्रयत्नांवर काँग्रेस आणि ‘इंडिया’ नाराज आहे. त्यांचा आरक्षणाबाबतचा हेतू घातक आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचे आरक्षण हिरावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,’ असे मोदी म्हणाले. विरोधकांनी राज्यघटनेचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भावनांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारी नोकऱ्या, खेळ, सरकारी निविदा आणि विद्यापीठांतील प्रवेशांत धर्माच्या आधारावर त्यांना आरक्षण हवे आहे. दलितांच्या आरक्षणाचा हक्क हिसकावून मुस्लिमांना आरक्षण द्यायचे आहे. धर्माच्या आधारे देशाची फाळणी करण्याचे हे खूप मोठे षडयंत्र आहे,’ असे ते म्हणाले.
सध्याच्या सरकारला आणखी एक संधी मिळाली, तर…; निकालाच्या आधी मल्लिकार्जुन खर्गे मोठे वक्तव्य
‘सततच्या निवडणुका चांगल्या नव्हेत’

कुशीनगर : ‘वारंवार होणाऱ्या निवडणुका देशासाठी चांगल्या नाहीत. त्यामुळे येत्या पाच वर्षांत एक राष्ट्र, एक निवडणूक लागू करण्यासाठी प्रयत्न केले जातील,’ असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी नमूद केले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, या विचारांचा आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत आम्ही एक राष्ट्र, एक निवडणुकीसाठी आवश्यक तरतुदी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू,’ असे ते म्हणाले. उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार विजयकुमार दुबे यांच्या प्रचारसभेत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर भाष्य केले.

मोदी म्हणाले…
– शीख दंगलीवेळी पेटते टायर टाकून त्यांना मारण्यात आले
– त्या वेळी त्यांनी राज्यघटनेची पर्वा केली नाही
– विरोधकांकडूनच राज्यघटना, बाबासाहेबांच्या भावनांचा अपमान

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.