Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Love Zodiac : प्रेमात या ६ राशी असतात लकी! वैवाहिक जीवनात राहतात नेहमी सुखी

12

Love Marriage Rashifal :

प्रेमाचे नाते हे वैवाहिक नात्यापेक्षा अधिक गोड असते. रक्ताची नाती आपल्याला जन्मातच मिळतात परंतु, प्रेमाची नाती आपण आपल्या स्वभावामुळे जोडतो. प्रेमाला वय नसते हे अगदी खरं…

प्रेम व्यक्त करण्यासाठी लागतो तो आत्मविश्वास, धैर्य आणि साहस. प्रेम आणि लव्ह लाईफमध्ये अनेकांचे विचार हे वेगळे असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो तसेच त्याचे गुणधर्म देखील वेगळे असतात. काही राशींचे लोक प्रेमाच्या बाबतीत हळवे असतात.

कुंडलीतील काही ग्रह अधिक मजबूत असल्यास तुमचे नाते नव्याने बहरते. शुक्र ग्रहाला प्रेमाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे तुमच्या कुंडलीत जर शुक्र मजबूत असेल तर नात्यात त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. तसेच जोडीदारासोबतचे वैचारिक नाते देखील चांगले असते. जाणून घेऊया प्रेमात कोणत्या राशी लकी ठरतात त्याविषयी

1. मेष

मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. या राशीच्या लोकांचा स्वभाव शांत असतो. त्यामुळे ते अनेकांच्या मनात आपले स्थान सहज मिळवतात. या राशीचे बहुतेक लोक लव्ह मॅरेजला अधिक प्राधान्य देतात. सुरुवातीला वैवाहिक जीवन चांगले असते. हळूहळू नाते नव्याने बहरते.

2. सिंह

सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रेम विवाह होण्याची शक्यता जास्त असते. या लोकांना प्रेमाबद्दल अधिक आदर असतो. या राशीचे लोक प्रेमात अधिक भाग्यवान मानले जातात. जेव्हा ते एखाद्यावर प्रेम करतात तेव्हा ते मनापासून त्या व्यक्तीला आपल सर्वस्व मानतात.

3. कन्या

कन्या राशीचे लोक उदार मनाचे आणि कर्तव्यनिष्ठ असतात. जेव्हा ते एखाद्यावर प्रेम करतात तेव्हा ते त्याची अधिक काळजी घेतात. या राशीच्या बहुतेक लोकांचा प्रेमविवाह होतो. त्यांची प्रेमाप्रती समर्पणाची भावना चांगली असते. आपल्या प्रेमाला खुश करण्यासाठी आणि प्रेम मिळवण्यासाठी ते अधिक प्रयत्नशील असतात.

4. तुळ

तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. जर कुंडलीतील शुक्र ग्रह हा अधिक मजबूत असेल तर तुमचे नाते अधिक नव्याने बहरते. ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशीचे लोक प्रेमात त्याग करण्यास नेहमी तयार असतात. त्यांचा त्यांच्या प्रेमावर खूप विश्वास असतो. प्रेम मिळवण्यासाठी ते कोणत्याही मर्यादेला जातात. परंतु, प्रेमात त्यांचा विश्वासघातही केला जातो.

5. मकर

ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचे लोक प्रेमविवाहाच्या बाबतीत भाग्यवान मानले जातात. आपले प्रेम लग्नापर्यंत नेण्यासाठी त्यांना फारसे कष्ट लागत नाही. ते त्यांच्या आजूबाजूला नेहमी प्रेमाचे वातावरण तयार करतात. त्यांच्या प्रेमावरील विश्वासामुळे त्यांना त्यांचे प्रेम सहज मिळते. जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी ते अधिक मेहनत घेतात.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.