Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आम्ही त्यांना ऑफर दिली होती पण राष्ट्रवादीने ती नाकारली, फडणवीसांनी सगळं सांगितलं

13

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा शपथविधी सोहळा आज संपन्न होत आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात (कोर्ट यार्ड) भव्य सजावट करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य ४० मंत्री शपथ घेतील. महाराष्ट्रातील ६ खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत पण महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा कुणीही नेता शपथ घेणार नाही. यामागील कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेत्यांबरोबर तरूण नेत्यांनाही संधी दिली गेली आहे. महाराष्ट्रातून आमचे नेते नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, प्रतापराव जाधव, त्याचबरोबर मुरली अण्णा मोहोळ, रक्षा खडसे यांना मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळेल. या सर्व नेत्यांचे मी शपथविधीच्या पूर्वीच अभिनंदन करतो मानतो.
PM Modi Oath Ceremony: नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ; दिल्ली हाय अलर्टवर, ‘हे’ परदेशी पाहुणे राहणार उपस्थित

राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्यावतीने राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशी एक जागा ऑफर करण्यात आली होती. मात्र आमच्याकडून प्रफुल पटेल यांचे नाव अंतिम झाले असल्याने आम्हाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, असे राष्ट्रवादीने आम्हाला कळविले. ज्यावेळी युतीचे सरकार असते त्यावेळी काही निकष तयार करण्यात येतात. अनेक पक्ष सोबत असल्याने त्यांनाही न्याय द्यायचा असतो. एका पक्षासाठी निकष मोडता येत नाहीत. पण भविष्यात जेव्हाही मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यावेळी आम्ही त्यांच्या मागणीचा विचार करू.
मंत्रिपदांबाबत काथ्याकूट; ‘एनडीए’तील मित्रपक्षांची प्रत्येक चार खासदारांमागे एका मंत्रिपदाची मागणी?

सध्या आमच्या मागणीच्या पूर्तता होत नसेल तर हरकत नाही परंतु आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच मिळावे, अशी त्यांची मागणी होती. प्रफुल पटेल यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा कारभार सांभाळल्याने त्यांना राज्यमंत्रिपद देऊ शकत नाही, असे राष्ट्रवादीने कळविले. भविष्यात मंत्रिमंडळ विस्तारावेळी मागणीची पूर्तता करू, असे आम्हीही कळविल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्राचा भौगोलिक विचार करता मंत्रिमंडळात मराठवाड्याला स्थान देण्यात आलेले नाही, असे विचारले असता, आत्ता मर्यादित लोक शपथ घेत आहेत. अजून बऱ्याच जागा शिल्लक आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावेळी नक्की विचार होईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.