Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Friday Upay : लक्ष्मी देवी राहिल नेहमी प्रसन्न, कर्जातून होईल सुटका; शुक्रवारी करा हे फूल अर्पण

7

Friday Remedies :

देवी लक्ष्मीचा वार हा शुक्रवार म्हणून ओळखला जातो. या दिवशी लक्ष्मी देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला अनेक उपाय सांगितले जातात. ज्यामुळे कर्जातून आपली सुटका होऊ शकते.

शुक्रवार हा दिवस शुक्र देवाला समर्पित आहे. शुक्र हा ग्रह भौतिक सुख, ऐश्वर्य, वैभव सौंदर्य इत्यादी गोष्टीचा मानला गेला आहे. लक्ष्मी देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी दर शुक्रवारी काही उपाय केल्यास फायदा होईल.

गुलाबाचे फूल दिसायला जेवढे सुंदर आहे, तितकेच त्याचे आध्यात्मिक महत्त्वही मानले जाते. माता लक्ष्मी, माता पार्वती आणि देवी दुर्गा यांना गुलाबाचे फूल सर्वात प्रिय मानले जाते. या त्रिमूर्ती देवतांच्या पूजा साहित्यात गुलाबाची फुले अवश्य ठेवा आणि त्यांना अर्पण करा. पूजेव्यतिरिक्त गुलाबाचे काही उपाय प्रभावी मानले जातात. हे उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होत नाही तर तुमच्या घरात धन-समृद्धीही वाढते.

ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की, गुलाबाचा सुगंध मनाला शांती तर देतोच पण तणाव दूर करण्यासाही मदत करतो. गुलाबच्या फुलाचे ज्योतिषीय शास्त्रात धनप्राप्तासाठी काही उपाय सांगण्यात आले आहे. हे उपाय करुन कर्जातून मुक्ती मिळू शकते. तसेच आर्थिक संकटावर मात करु शकता.

शुक्रवारी गुलाबाचे लाल फूल, चंदन आणि कुंकू एका लाल कापडात बांधा. पूजेच्या वेळी घराच्या मंदिरात ठेवा त्यानंतर ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. असे केल्याने लक्ष्मी देवीची कृपा सदैव राहिल.

कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी गुलाबाचा हा उपाय खुप प्रभावी मानला जातो. चांदीच्या भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि कापूर एकत्र जाळा. नंतर लक्ष्मी देवाला अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला कर्जाच्या समस्येपासून लवकरच आराम मिळतो.

जर तुमचे कोणतेही काम सतत रखडत असेल तर कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात रात्री वाहत्या पाण्यात 3 गुलाब आणि 3 पांढरी फुले तरंगवा. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो आणि माता लक्ष्मीही प्रसन्न होते. तुमची महत्त्वाची कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होऊ लागतील.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.