Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जंगलात चकमक
अबुझमाडच्या जंगलात शनिवारी सकाळी ही चकमक सुरू झाली. नारायणपूर, कांकेर, दंतेवाडा आणि कोंडागाव या चार जिल्ह्यांतील संयुक्त सुरक्षा पथकाने माओवादविरोधी मोहीम सुरू केली होती. त्या वेळी ही चकमक झाली. यामध्ये विशेष कृती दलाचे दोन जवान जखमी झाल्याचेही रायपूर येथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
संयुक्त मोहीम
राज्य पोलिसांचे जिल्हा राखीव गार्ड (डीआरजी) आणि विशेष कृती दल, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांची (आयटीबीपी) ५३वी बटालियन, सीमा सुरक्षा बलाची (बीएसएफ) १३५वी बटालियन यांतील जवान या पथकामध्ये होते. कुतुल, फारसबेडा आणि कोडतामेटा गावांतील जंगलात १२ जूनला या पथकाने मोहीम सुरू केली होती.
शस्त्रसाठा हस्तगत
सुरक्षा दलांनी या परिसरात नाकाबंदी केल्यानंतर चकमक सुरू झाली. खूप वेळ ही चकमक सुरू होती. चकमक थांबल्यानंतर आठ माओवाद्यांचे मृतदेह घटनास्थळी सापडले. इन्सास रायफल, पॉइंट ३०३ राफयल, बॅरेल ग्रेनेड लाँचर (बीजीएल) आणि इतर शस्त्रे, माओवादाशी संबंधित साहित्य घटनास्थळी सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जखमींवर उपचार
चकमकीत जखमी झालेल्या जवानांना सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी त्यांना रायपूरला हवाई मार्गे नेण्यात आले.
या वर्षी १३१ माओवादी ठार
बस्तर विभागात या वर्षी आतापर्यंत १३१ माओवाद्यांना ठार मारण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. बस्तर विभागात कांकेर, कोंडागाव, नारायणपूर, बस्तर, बिजापूर, दंतेवाडा आणि सुकमा या जिल्ह्यांचा समावेश होतो. पाच जूनला नारायणपूर येथे सहा माओवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले होते. नारायणपूर-बिजापूर सीमेवर २३ मे रोजी सात माओवाद्यांना ठार करण्यात आले होते. दहा मे रोजी बिजापूर येथील चकमकीत १२ माओवाद्यांना ठार करण्यात आले होते, तर १६ एप्रिलला कांकेर जिल्ह्यातील चकमकीत २९ माओवादी ठार झाले होते.
कोठे झाली चकमक?
छत्तीसगड
नारायणपूर