Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सल्ला कधी आवश्यक?
– विशेष देखभालीची गरज, निदान चाचण्या आणि दाखल असलेल्या विभागात उपलब्ध नसलेल्या वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता असेल, त्या वेळी संबंधित रुग्णाला तातडीने अन्य विभागांत घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात यावा.
– वैद्यकीय तज्ज्ञांचा (कन्सल्टंट) सल्ला घेण्याची शिफारस केवळ वैद्यकीय तज्ज्ञच करू शकतात. पदव्युत्तर निवासी डॉक्टरांनी वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा केल्याशिवाय स्वत:हून रेफर करू नये.
– संबंधित वैद्यकीय सल्लागाराने त्याच्या पथकाने आदल्या दिवशी घेतलेल्या रेफरल नोंदींचा आढावा घेणे गरजेचे आहे, जेणेकरून रुग्णांची अधिक चांगली देखभाल करणे आणि निवासी डॉक्टरांना धडे देण्यास मदत होईल.
‘रेफरल’मध्ये आवश्यक
– रेफरल प्रक्रियेत रुग्णाची माहिती, अपेक्षित परिणाम, प्राधान्ये, अन्य सूचना यांची अचूक, सर्वंकष नोंद ठेवणे.
– अन्यत्र पाठवलेल्या रुग्णांचा पाठपुरावा, समन्वयाने देखभाल.
– रुग्ण पाठवलेल्या विभागाकडून प्रतिसाद प्राप्त करणे.
अनावश्यक विलंब टाळा
– रुग्णसेवा बाधित होईल, अशा रितीने रेफरल प्रक्रियेला अनावश्यक विलंब
– आवश्यक वैद्यकीय माहिती, कागदपत्रे वगळणे
– पाठवलेले रुग्ण सामान्य किंवा तातडीची गरज असलेले नाहीत, असे गृहीत धरणे
– तातडीच्या प्रसंगी वरिष्ठ सहकारी किंवा रुग्णालय प्रशासनाची मदत घेण्यास संकोच
कोणत्याही वैद्यकीय संस्थेत रेफर करण्याची प्रक्रिया हा उच्च दर्जाच्या रुग्णसेवेतील महत्त्वाचा घटक असतो. समन्वय, संवादाचा अभाव, सुस्पष्ट, निर्धारित प्रक्रियांचा अभाव, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अपुरे प्रशिक्षण या समस्यांमुळे रुग्णसेवेवर परिणाम होऊ शकतो. अनेक रुग्णांना सहव्याधी असल्याने बहुशाखीय उपचारांची गरज असते. अशा स्थितीत मार्गदर्शक तत्त्वे लाभदायी ठरतील.
– डॉ. अतुल गोयल,
आरोग्य सेवा महासंचालक, केंद्रीय आरोग्य मंत्रालय