
Tej Police Times

ईदला बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते, यावरुन विवेक जैन यांचे गुरु संजीव हे अत्यंत अस्वस्थ होते. त्यांनी विवेक यांना फोन केला आणि याबाबत काही करायची इच्छा असल्याचं सांगितलं. सगळ्या बकऱ्यांना तर वाचवू शकत नाही, पण शक्य तितक्या बकऱ्या वाचवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्याबाबत प्लानिंग करण्यात आली आणि १५ जूनच्या सायंकाळी जैन समाजाच्या २५ जणांचं एक पथक तयार करण्यात आलं. पैसे जमवण्यासाठी व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवण्यात आले. त्यानंतर एक पथक हे बाजापात गेली. बकऱ्यांची किंमत जाणून घेतली.
१६ जूनला गुप्त पद्धतीने जुन्या दिल्लीतील जामा मशीद, मीना बाजार, मटिया महल आणि चितली कबर सारख्या बाजारात गेले. सर्वांना हे सांगण्यात आलं होतं की त्यांन मुस्लिमांसारखा पेहराव करावा. जेणेकरुन कुठलीही समस्या उद्भवू नये. आम्हाला कुठली भीती नव्हती, पण जर त्यांना माहिती झालं असतं की आम्ही मुस्लिम नाही तर त्यांनी आम्हाला जास्त दरात बकरे विकले असले, असंही विवेक जैन यांनी सांगितलं.
बकऱ्यांची खरेदी करताना फार मोलभाव करण्यात आला नाही, हे बकरे १० हजार रुपये प्रतिच्या हिशेबाने खरेदी करण्यात आली. यावेळी तब्बल १२४ बकऱ्यांना वाचवण्यात आलं. विवेक जैन यांनी सांगितलं की, त्यांनी गुजरात, हैदराबाद, केरळ, पंजाब आणि महाराष्ट्रातून तब्बल १५ लाख रुपये जमा केले होते. जे पैसे वाचले त्यातून बकऱ्यांसाठी चारा विकत घेण्यात आला. आता या बकऱ्यांना गाईच्या गोठ्यात किंवा दुसऱ्या कुठल्या ठिकाणी पाठवलं जाईल.
विवेक यांनी सांगितलं की त्यांनी कधी विचारही केला नव्हता की ते चार बकऱ्यांचीही खरेदी करु शकतील. पण, त्यांच्या अपीलमुळे लोकांनी मोठ्याप्रमाणात दान दिलं आणि ते १२४ बकऱ्यांना वाचवू शकले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.