तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

मोदींची चमचेगिरी बंद करा ; निखिल वागळेंनी खा.उन्मेष पाटलांना फटकारले.. !

0 97

जळगाव: लखीमपूर खेरी प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीतर्फे ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. भाजपा विरोधात हा बंद आहे. पण या बंदला नागरीक प्रतिसाद देणार नाहीत, असा दावा भाजप नेते करताय. अश्याच आशयाचे एक ट्विट भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी केले होते. त्यावर “मोदींची चमचेगिरी बंद करा, असे ट्विट करत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी उन्मेष पाटील यांना चांगलेच फटकारले आहे.

उन्मेष पाटील यांनी रविवारी एक ट्विट करत म्हटले होते की, “उद्याच्या महाराष्ट्र बंदला राज्यातील व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध! सर्व दुकाने सुरूच राहणार, माझा महाराष्ट्र सुरूच राहिल..असा दावा केला होता.

त्यांच्या या दाव्याला निखिल वागळे यांनी उत्तर देत “व्यापारी स्वार्थी आहेत,भाजपचे गुलाम आहेत,त्यांना वठणीवर आणलं पाहिजे. शेतकरी नसतील तर तुम्ही कसे जेवू शकाल? मोदी घालतील का जेवायला? असा सवाल विचारला होता.

त्यावर उन्मेष पाटील यांनी उत्तर देत “पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात देश आत्मनिर्भर होऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे,व्यापारी सुज्ञ आहेत,महाराष्ट्र बंद होणार नाही.संपूर्ण महाराष्ट्रात महापूरसदृष परिस्थिती निर्माण झाली होती त्या शेतकरी बांधवांना आज पावेतो कोणतीही मदत देण्यात आलेली नाही ? ” असे ट्विट केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.