Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

यंदाच्या वर्षात ४३०० भारतीय कोट्यधीश देश सोडणार; कोणत्या देशांमध्ये बस्तान बसवणार?

13

नवी दिल्ली: एका अहवालातून देशासंबंधी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार या वर्षात सुमारे ४,३०० कोट्यधीश भारत सोडून जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हेन्ली अँड पार्टनर्स नावाच्या विदेशी गुंतवणूक कंपनीच्या अहवालात ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. जर देशातून इतक्या मोठ्याप्रमाणात कोट्यधीश निघून गेले तर ते देशासाठी अत्यंत घातक ठरु शकतं.

देशातून अनेक श्रीमंत लोक जात असले तरी दरवर्षी देशात नवे श्रामंत तयार होत आहेत. अनेकांचा भारतात व्यवसा आहे तर काहींची मालमत्ता आहे. ते देशाच्या अर्थव्यवस्थेत मदत करतात. या अहवालानुसार, ‘इतके लोक देशातून बाहेर पडत असले तर त्यात काळजी करण्यासारखे काही नाही. कारण दरवर्षी देश सोडून जाणाऱ्या कोट्यधीशांच्या तुलनेत देशात अधित नवे कोट्यधीश तयार होत आहेत.’ हे श्रीमंत लोक भारत सोडून गेले तरी त्यांचे व्यवसाय आणि सेकंड होम हे भारतातच आहेत. भारतासाठी ही चांगली गोष्ट आहे. काही लोक देश सोडून गेले तरी भारताचे आर्थिक आणि व्यावसायिक वातावरण चांगले राहते आणि श्रीमंत लोकांना ते आकर्षित करते. हे श्रीमंत देश सोडून जात असले तरी ते त्यांच्या मालमत्ता आणि गुंतवणुकीद्वारे ते भारताच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत आहेत.

जे श्रीमंत लोक देश सोडत आहेत ते यूएईला जात आहेत

अहवालानुसार, भारत मोठ्या संख्येने कोट्यधीशांना गमावत आहे. हे लोक भारत सोडून जास्तकरुन यूएईला स्थायिक होत आहेत. तर २०२४ मध्ये जगभरातील सुमारे १,२८,००० कोट्यधीश हे नवीन देशात राहायला जाऊ शकतात. यातील बहुतांश लोक हे यूएई आणि अमेरिकेत जातील. श्रीमंत लोकांचे हे स्थलांतर हे देशाची आर्थिक स्थिती दर्शवते.

देशातून श्रीमंत लोकांचं स्थलांतर हे मध्यमवर्गीयांसाठी चिंतेची बाब आहे. कारण, याच श्रीमंत लोकांनी उघडलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून माध्यमवर्गीयांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. उदाहरणार्थ, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल आणि टेस्ला सारख्या कंपन्यांनी अमेरिकेत हजारो लोकांना रोजगार दिला आहे. या कंपन्यांचा अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो हे यावरून दिसून येते.

श्रीमंत व्यक्तींनी देश सोडणे यावरुन त्या देशाची आर्थित स्थिती कळते. रिपोर्टनुसार, जर कुठल्या देशातून अनेक श्रीमंत लोक स्थलांतर करत असतील, तर कदाचित तिथे कुठली मोठी समस्या असू शकते. तसेच, देशाच्या भविष्याच्या दृष्टीनेही ही चिंतेची बाब आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.