
Tej Police Times
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी बऱ्याच नियमांचे पालन लोक करत असतात, जसे की बुट आणि चप्पल काढून ठेवणे, हातपाय धुणे, डोके झाकणे इत्यादी. यानंतर जेव्हा लोक मंदिरात प्रवेश करत असतात तेव्हा ते मंदिराच्या पहिल्या पायरीवर वाकून प्रणाम करतात. मंदिरात प्रवेश करताना पायरीवर वाकून नमस्कार करणे एक प्रथा आहे आणि हा एक श्रद्धेचा भागही आहे. ही प्रथा पाळण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. हे कारण काय आहे, ते समजून घेऊ.
मंदिराची पायरी मंदिराकडे नेणारा दुवा !
मंदिर अतिशय पवित्र आणि सन्मानाची जागा, तसेच लोकांचे श्रद्धास्थान मानले जाते. या मंदिरात प्रवेश करताना तुमचे शरीर, मन आणि भावना प्रत्येक प्रकारे शुद्ध आणि समर्पित असले पाहिजे. तरच तुम्ही त्या परमपित्या शक्तीच्या समीप जाऊ शकता किंवा त्यांची कृपादृष्टी तुम्हाला मिळू शकते. जे आंतरिक समाधान तुम्हाला हवे असते, ज्यासाठी तुम्ही मंदिरात जाता ते तुम्हाला तेव्हाच मिळते जेव्हा तुमचे मन आणि शरीर शुद्ध आहे. जेव्हा तुम्ही शुद्ध मनाने मंदिरात प्रवेश करता तेव्हा सर्वात प्रथम लागते ती मंदिराची पायरी ! ती पायरी म्हणजे देवाकडे आपल्याला नेणारा दुवा किंव माध्यम आहे. तिला ओलांडून गेल्या शिवाय गाभाऱ्यातील देवाचे दर्शन होत नाही, म्हणून त्या पायरीचे महत्त्व अधिक आहे.
जेव्हा तुम्ही पहिल्या पायरीवर वाकून नमस्कार करता तेव्हा सर्वप्रथम तुम्ही त्या देवतेला सन्मान देत असता, ज्याच्या दर्शनसाठी तुम्ही आलेला आहात. मंदिर एक पवित्र स्थान आहे, त्यामुळे प्रणाम करणे हे सूचित करते, की तुम्ही प्रत्येक प्रकारची नकारात्मक भावना मागे सोडून मंदिरात प्रवेश करण्यासाठी तयार आहोत. हे आचरण तुम्हाला जमिनीशी जोडते आणि अहंकारापासून मुक्त असल्याचा अनुभव देते. मंदिराच्या पायरीवर वाकून स्पर्श केल्याने व्यक्तीमध्ये राग, अहंकार नष्ट होतो. मंदिरात प्रवेश करताना पायरीवर वाकून नमस्कार करणे आणि आशीर्वाद घेणे तुमच्या आत्मसमर्पणाचे द्योतक आहे. याशिवाय मंदिराची पहिली पायरी तुम्हाला देवाशी जोडते. या पायरीत देवाचा वास आहे, या आस्थेने तुम्ही तुम्ही या पायऱ्यांना प्रणाम करत असता.
तुम्ही प्राचीन परंपरांमध्ये हे पाहिले असेल की लोक नेहमी मंदिराच्या पायऱ्यांवर बसून वेळ घालवतात. काही वेळा हे आपल्याला अकारण वाटते, आपल्याला असे वाटते की लोक काही वेळ मंदिरात घालवू इच्छितात. पण या मागेही एक मोठे रहस्य दडलेले आहे. वास्तविक पाहता धार्मिक मान्यतेनुसार मंदिराचे शिखर म्हणजे देव विग्रहाचे मुख आहे आणि मंदिराच्या पायऱ्या म्हणजे देव विग्रहाच्या पादुका मानल्या गेल्या आहेत. त्यामुळे शिखराचे दर्शन घेतल्यानंतर लोक मंदिराच्या पायरीवर बसून देवीदेवतांचे स्मरण करतात. मंदिराच्या पायऱ्या हा देव विग्रहाच्या चरणासमान आहेत. त्यामुळे जो कोणी येथे शुद्ध मनाने येतो आणि प्रार्थना करतो, त्याच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.
Recover your password.
A password will be e-mailed to you.