
Tej Police Times

शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासण्यांनंतर या प्रकरणाचा उलगडा होऊ शकेल. पोलीस सध्या फॉरेन्सिकच्या पथकाची वाट पाहत आहेत. योगायोग म्हणजे १ जुलै २०१८ रोजी दिल्लीच्या बुराडी परिसरात अशाच प्रकारे एका कुटुंबातील ११ सदस्यांनी सामूहिक आत्महत्या केली होती. आता त्याच दिवशी आणि त्याच पद्धतीनं एका कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह सापडले आहेत.
अलिराजपूर जिल्ह्यातील सोंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राऊडी गावातील एका घरात पती, पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले. राकेश, त्यांची पत्नी ललिता, मुलगी लक्ष्मी, मुलगा प्रकाश आणि अक्षय अशी मृतांची नावं आहेत. कुटुंबाच्या नातेवाईकांनी हत्येची शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्व शक्यता विचारात घेऊन तपास सुरु केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राजेश व्यास गावात पोहोचले. पोलिसांनी नातेवाईक, शेजाऱ्यांकडे चौकशी केली. कुटुंबाचा प्रमुख किंवा अन्य कोणत्याही सदस्यानं कधीच कोणता त्रास असल्याचं सांगितलेलं नव्हतं, असं शेजाऱ्यांनी सांगितलं. राकेश यांचे काका सकाळी घरी पोहोचले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी याबद्दल पोलिसांना लगचेच कळवलं.
बुराडी प्रकरण काय?
दिल्लीतील बुराडी परिसरात सहा वर्षांपूर्वी सामूहिक आत्महत्या कांड घडलं होतं. एकाच कुटुंबातील ११ जणांनी आत्महत्या केली होती. ही घटना १ जुलै २०१८ रोजी घडली होती. घरातील दृश्य पाहून शेजारीपाजारी हादरले होते. आधी हे प्रकरण हत्येचं वाटत होतं. पण सीसीटीव्ही फुटेज आणि शवविच्छेदन अहवालातून ११ जणांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं. कुटुंबाचा प्रमुख असलेल्या ललित भाटियानं मंत्रतंत्रातून संपूर्ण कुटुंबाला आत्महत्या करण्यास भाग पाडलं होतं.
Recover your password.
A password will be e-mailed to you.