Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Tariff Hike: Airtel, Jio आणि Viच्या प्लॅन्सच्या दरवाढीनंतर या सरकारी कंपनीला अच्छे दिन, दररोज जोडले जात आहेत हजारो नवीन ग्राहक

11

Tariff Hike: देशातील तीन प्रमुख खाजगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone Idea ने अलीकडेच त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या प्लॅनमध्ये जवळपास 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Airtel, Jio आणि Vodafone Idea चे प्लॅन्स महाग झाल्यानंतर काही सर्कलमध्ये या कंपनीच्या सिमची विक्री तीन पटीने वाढली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सोशल मीडियावर BSNL दररोज ट्रेंड करत आहे आणि लोक खाजगी कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. Airtel, Jio आणि Vodafone Idea चे प्लॅन्स महाग झाल्यानंतर काही सर्कलमध्ये BSNL सिमची विक्री तीन पटीने वाढली आहे. याशिवाय लाखो युजर्सनी त्यांचे सिम बीएसएनएलकडे पोर्ट केले आहे. अनेक युजर्स आता दरवाढीला कंटाळून या सरकारी कंपनीची निवड करत आहेत.

एका जिल्ह्यात दररोज 500 नवीन सिमकार्डची विक्री होत आहे

अनेक अहवालांनुसार, जेव्हापासून खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन महाग झाले आहेत, तेव्हापासून बीएसएनएल सिमची विक्री तीन पटीने वाढली आहे. याशिवाय बीएसएनएलमधील पोर्टेबिलिटीही अडीच पटीने वाढली आहे. अहवालानुसार, बिहार-झारखंड सर्कलच्या धनबादमध्ये दररोज 500 बीएसएनएल सिम विकले जात आहेत.

गेल्या महिन्यात हा आकडा दररोज 150 होता. याशिवाय अवघ्या 6 दिवसांत बीएसएनएलचे 2500 नवीन ग्राहक तयार झाले आहेत. दुसऱ्या अहवालानुसार, राजस्थानमध्ये अवघ्या एका महिन्यात 1,61,083 लोक बीएसएनएलशी जोडले गेले आहेत. याच कालावधीत, 68,412 ग्राहकांनी Airtel आणि 6,01,508 ग्राहकांनी Jio ला निरोप दिला.

BSNL चे 4G पुढील महिन्यात सुरू होत आहे

BSNL ची 4G सेवा पुढील महिन्यात देशाच्या सर्व भागात सुरू होत आहे. सुरुवातीला ग्राहकांना मोफत 4G सिम कार्ड मिळतील. याशिवाय विद्यमान ग्राहकांचे सिमकार्ड सुद्धा मोफत 4G वर अपग्रेड केले जातील.

BSNL ने नुकतेच तामिळनाडूच्या तिरुवल्लुवर जिल्ह्यात 4G लाँच केले आहे. BSNL 4G सह उत्तम कनेक्टिव्हिटी आणि नेटवर्कचा दावा केला जातो. BSNL 4G च्या या लॉन्चमुळे नोचिली, कोलाथूर, पल्लीपेट, थिरुवेल्लावोयल आणि पोनेरी सारख्या भागांना फायदा होईल. यानंतर तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये 4G रोलआउट केले जाईल.

गौरव कुलकर्णी

लेखकाबद्दलगौरव कुलकर्णीगौरव कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स येथे कन्सल्टंट डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. २ वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांविषयी लिहित आहे. त्याने यापूर्वी लाइफस्टाइल व अर्थ विषयात लिखाण केले आहे. Times internet संचलित MENSXP आणि Mahamoney.Com येथे त्याने काम केले आहे. यासोबतच त्याला विज्ञान व टेक्नोलॉजी या विषयात विशेष रस आहे. याव्यरिक्त तो लेखक, कवी आणि दिग्दर्शक देखील आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.