तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

‘आम आदमी’वर मोठे संकट, पक्षाची मान्यता रद्द होणार? ईडीची सर्वांत मोठी चाल!

0 35

म.टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मुख्य संयोजक असलेल्या सत्ताधारी आम आदमी पक्षाचीही मान्यता आता अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. ईडीने सर्वोच्च न्यायालयात बुधवारी दाखल केलेल्या आपल्या आरोपपत्रात केजरीवाल यांना आरोपी क्रमांक ३७ आणि आप ला ३८ व्या क्रमांकाचा आरोपी बनवले आहे.

एखाद्या कथित घोटाळ्यात एखाद्या राजकीय पक्षालाच आरोपी बनविणे ही विरळा घटना आहे. याचा अर्थ आरोप सिध्द झाला तर त्या पक्षाची मान्यता रद्द होणे हा आहे. त्यामुळे ईडीची नवीन चाल हा दिल्लीत सलग तीनदा निवडणुका जिंकणाऱ्या आप साठी सूचक इशारा मानला जातो. केजरीवाल हे आपचे राष्ट्रीय समन्वयक आहेत आणि त्यामुळे संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे, असे ईडीचे म्हणणे आहे.

ईडीने या २३२ पानी आरोपपत्रात मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दारू व्यावसायिकांशी संगनमत करून आपल्या बाजूने धोरण वळवून आपच्या सर्वोच्च पक्षनेत्याला फायदा मिळवायचा होता, असे यात म्हटले आहे. दारू घोटाळ्यातून आप ला मिळालेल्या १०० कोटी रुपयांच्या लाचेपैकी ४५ कोटी रुपये गोवा विधानसभा निवडणुकीत वापरण्यासाठी हवालाद्वारे पाठवण्यात आले होते. गोव्याच्या निवडणुकीत किती पैसा वापरला गेला याची केजरीवाल यांना पूर्ण कल्पना होती आणि ते स्वतः त्यात गुंतले होते असा आरोप करताना ईडीने केजरीवाल आणि आरोपी विनोद चौहान यांच्या व्हॉट्सॲप चॅटचा तपशील न्यायालयात सादर केला.
WhatsApp Chats as Evidence: व्हॉट्सॲपचे चॅट पुरावा म्हणून वापरले जाऊ शकता का? दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय

तेलंगणमधील बीआरएस च्या नेत्या के. कविता यांचा पी ए असलेला चौहान याच्या माध्यमातून गोवा निवडणुकीत आप ला पहिल्या हप्त्यात साडेपंचवीस कोटी रुपये पाठवल्याचा आरोप यात आहे. चौहान व केजरीवाल यांचे घनिष्ठ संबंध असल्याचे या व्हॉट्सॲप गप्पांमधून स्पष्ट झाल्याचे इडीचे म्हणणे आहे.

ईडीने या आरोपपत्रात गुन्ह्याच्या प्रक्रियेबद्दलही सांगितले आहे. चौहान याच्या फोनमधून हवाला नोट नंबरचे अनेक स्क्रीन शॉट्स जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. गोव्यात पोहोचलेल्या कोट्यवधी रुपयांचे व्यवस्थापन चनप्रीत सिंग करत होता. हवालाद्वारे गोव्यात पोहोचलेल्या पैशांबाबत चौहान आणि अभिषेक बोन पिल्लई यांच्यात झालेल्या संभाषणाचे पुरावेही इडीकडे आहेत. अशोक कौशिक यांनीच बॉन पिल्लईच्या सूचनेनुसार दोन वेगवेगळ्या तारखांना चौहान याला पैसे दिले व आम्ही त्यांचेही (कौशिक) म्हणणे नोंदवून घेतल्याचे ईडीने म्हटले आहे. केजरीवाल यांच्या जवळचे विजय नायर यांचीही दिल्ली दारू धोरण बनवण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे ईडीने म्हटले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.