तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Raman Divo In Anant- Radhika Wedding : नीता अंबानीच्या हातात असणारा रमण दिवो लग्नात किती महत्त्वाचा? गुजराती समाजात याचे महत्त्व काय?

0 38

Nita Ambani Holding Raman Divo Anant Radhika Wedding:

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे १२ जुलैला लग्न होणार आहे. अशातच या शाही विवाह सोहळ्यात अनेक महत्त्वाच्या विधी पार पडत आहे. लग्न म्हटलं अनेक परंपरांना विविध पद्धतीने महत्त्व दिले जाते. प्रत्येक समाजात लग्न काळात अनेक विधी असतात ज्या लग्नापूर्वी आणि नंतर दोन्ही वेळी रित्या पार पाडणे गरजेचे असते.

यापूर्वी अनंत आणि राधिकाने आपल्या लग्नाच्या पूर्वीच्या विधी फार मोठ्या उत्साहात पार पाडल्या. अशातच वरातीत नीता अंबानीच्या हातात रमण दिवा पाहाण्यात आला.

गुजराती समाजात रमण दिव्याला अधिक महत्त्व आहे. या दिव्याची मोठी परंपरा मानली जाते. हा दिवा शुभ समृद्धी प्रतीक असून यात स्वस्तिक आणि गणपतीची मूर्ती कोरली आहे. गुजराती समाजात लग्नाच्या प्रसंगी, वराची आई तिच्या हातात रमण दिवो धरते आणि आपल्या मुलाच्या वैवाहिक आयुष्यासाठी प्रार्थना करते. हा दिवाचे वराचे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करते. तसेच लग्नातील अनेक अडथळे दूर होऊन श्रीगणेशाचा आशीर्वाद वर आणि वधुवर राहातो असे म्हटले जाते.

रमण दिवो हा मंगलदीपचा एक प्रकार आहे. जो गुजराती समाजात लग्न समारंभात वापरला जात नाही तर प्रत्येक शुभ कार्यात याचा वापर केला जातो. मुलाच्या जन्मापासूनच घरात रमण दिवा लावण्याची प्रथा आहे. हा दिवा विशेष पूजा विधी आणि दिवाळीच्या निमित्ताने घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येण्यासाठी दिवाळीत प्रज्वलित केला जातो. रमण दिवो वास्तू दोष दूर करण्यासाठी घरात ठेवला जातो.

हिंदू धर्मात शुभ कार्यात दिवे लावले जातात. दिवा हा सकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे. म्हणून हिंदू धर्मात लग्नाच्या वेळी वरातीत आरती दिवा लावून केली जाते. वधू जेव्हा सासरी येते तेव्हा तिची आरती केली जाते. काही ठिकणी वराला भगवान राम तर काही ठिकाणी शिव आणि वधूला देवी सीता आणि गौरीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे दीप प्रज्वलित करुन आरती केली जाते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.