Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आषाढी एकादशीला करा पद्म पुराणात सांगितलेल्या ‘या’ ५ गोष्टी, भगवान विष्णू होतील प्रसन्न

11

देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू पंचांगानुसार ४ महिने झोपतात. अशी श्रद्धा आहे की, भगवान विष्णू आपल्या चतुर्भुज रूपात यावेळी निद्रावस्थेत जातात आणि वामनाच्या रूपात बळी राजाला दिलेल्या वरदानानुसार पाताळ लोकात निवास करतात. यावेळी श्रावणामध्ये मलमास आल्याने श्रावण दोन महिन्याचा होत आहे. त्यामुळे भगवान विष्णू जवळपास ५ महिने निद्रेत राहतील. पद्मपुराणात असे सांगितले आहे की, जेव्हा भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात, त्या दिवशी म्हणजेच देवशयनी एकादशीच्या दिवशी मनुष्याने भगवान विष्णूच्या प्रसन्नतेसाठी ५ गोष्टी केल्या पाहिजेत. यावेळी देवशयनी एकादशी २९ जून रोजी साजरी केली जात आहे. या दिवशी तुम्ही पद्म पुराणात सांगितलेले हे ५ उपाय अवश्य करून पाहा.

देवासाठी झोपण्याची व्यवस्था करा

पद्मपुराणानुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी व्रत करून मनुष्याने दोन्ही वेळी भगवान विष्णूची पूजा करावी. संध्याकाळी भगवान विष्णूच्या मूर्तीची स्थापना करून भगवान विष्णूला दूध, दही, तूप, मध आणि गंगाजलाने स्नान घालावे. यानंतर त्यांना मऊ पलंगावर झोपपावे. त्यांच्यासाठी मऊ पलंग, गादी, उशी, मच्छरदाणी यांची सुंदर व्यवस्था करावी. डोक्यावर तुळशीचे पानही ठेवावे. अशा देवाच्या पलंगाची व्यवस्था करणाऱ्या भक्तावर देव खूप प्रसन्न होतो असे सांगितले जाते.

विष्णूसहस्त्रनामाचे वाचन आणि हवन करा

विष्णूसहस्त्रनामाचे वाचन आणि हवन करा

देवशयनी एकादशीच्या दिवशी पूजेदरम्यान हवन आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ अवश्य करावा. पद्मपुराणानुसार विष्णु सहस्रनामाचा पाठ करणार्‍या व्यक्तीला भगवान पापांपासून मुक्त करतात. शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवावा आणि सहस्रनाम अर्थात भगवान विष्णूच्या हजार नामांचा जप करताना तूप आणि काळ्या तिळाने हवन करावे. याद्वारे भगवंत तुम्हाला मागील जन्मी, जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्त करतात असे सांगितले जाते.

रात्री जागरण आणि भजन-किर्तन करा

रात्री जागरण आणि भजन-किर्तन करा

पद्मपुराणानुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रामध्ये जातात. अशा स्थितीत रात्री जागृत राहून भजन कीर्तन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. या दिवशी उपवास करणाऱ्यांनी रात्री जागरण करण्याचा प्रयत्न करावा.

चातुर्मासात पलंगावर झोपू नका

चातुर्मासात पलंगावर झोपू नका

आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून चातुर्मासाचा संकल्प करा. पद्मपुराणात असे सांगितले आहे की, चातुर्मास व्रताचा संकल्प करा आणि एकवेळच भोजन करा. तसेच देवशयनी एकादशीपासून देव प्रबोधिनी एकादशीपर्यंत जमिनीवर झोपावे. कारण यावेळी भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. याशिवाय चातुर्मासात केळीच्या पानांवर जेवण घ्यावे आणि ब्रह्मचर्य पाळावे. जे विष्णू भक्त आषाढी एकादशीला या पद्धतीने उपवास करतात, त्यांना देव मोक्ष देतो.

अन्नदान करा

अन्नदान करा

पद्मपुराणानुसार एकादशी तिथीला केलेले दान माणसाला अनेक जन्मांचे फळ देते. म्हणूनच देवशयनी एकादशीच्या दिवशी व्यक्तीने अन्न आणि पलंग दान करावे. या दिवशी दान केल्याने तुम्हाला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल. यासोबतच माणसाच्या घरात कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.