
Tej Police Times
सध्याची स्थिती पाहता विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर ही चार जलाशये ओसंडून वाहू लागली आहेत. आज सकाळी सहा वाजेपर्यंत पाणीसाठ्याची ६६.७७ टक्के इतकी नोंद करण्यात आली आहे.
या संपूर्ण स्थितीचा आढावा लक्षात घेता, मुंबई महानगराच्या पाणी पुरवठ्यात सध्या लागू असलेली दहा टक्के पाणीकपात ही येता सोमवार म्हणजेच दिनांक २९ जुलैपासून मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच, ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतींना बृहन्मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील १० टक्के पाणी कपात देखील सोमवार दिनांक २९ जुलै पासून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याआधी, बुधवारी सायंकाळी मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हरफ्लो झाले होते. चार वाजून पंधरा मिनिटांनी दरवाजे ओपन होऊन तुडुंब भरून वाहू लागले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या धरणाची ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मी. टीएचडी इतकी आहे. तानसा धरण परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे तानसा धरणाच्या लगतच्या आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Pune Rains : पुण्यात मुसळधार पावसाने पूर, लेकीला खांद्यावर घेतलं, पाच फूट पाण्यातून वाट काढत बाप निघाले
भातसा धरणही ६५ टक्के भरले आहे. तर मोडकसागर धरण ९१ टक्के भरले आहे. मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ होत असून, सर्व धरणात पाण्याचा साठा वाढल्याने तूर्तास मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे.
शहापूर तालुक्यातील तानसा धरणाखालील व लगत असलेल्या भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नवेरे, वेलवहाळ, डिंबा व खैरे या गाव, वाड्या, पाड्यातील रहिवाश्यांनी सतर्क रहाण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी दिले आहेत.
Recover your password.
A password will be e-mailed to you.