
Tej Police Times
‘दुर्घटना घडली, त्या वेळी गावात पारावर होतो. त्यामुळे मी आणि वडील वाचलो; पण आई, भाऊ, बहीण आणि बहिणीची तीन मुले मृत्यू पावली. सरकारने आता नवीन गाव वसवले आहे. मात्र, आमचे गावच चांगले होते. नवीन गावात लोकांचा संपर्क कमी झाला आहे. काही कार्यक्रम असेल, तरच लोक एकत्र येतात. जुन्या गावात समाज मंडळाचे ऑफिस होते. तेथे दररोज ग्रामस्थ फेरफटका मारायचे. त्यामुळे संवाद होत होता. आता ते चित्र बदलले आहे,’ अशी भावना मच्छिंद्र दांगट या तरुणाने व्यक्त केली.
Kerala Landslide: केरळमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन; ढिगाऱ्याखाली १०० हून अधिकजण अडकले
माळीण दुर्घटनेवेळी घराबाहेर असलेले लोक बचावले. त्यात मंगलदास विरणक (५५ वर्षे) यांचा समावेश आहे. त्या दिवशी खूप पाऊस झाला होता. बुब्रा नदीला पूर आला होता. नदीचे पाणी पुलावरून जात होते. ते पाहायला म्हणून घराबाहेर पडलो आणि मागे एका मिनिटात गावावर दरड कोसळली. कोणाला हालचाल करायचीही वेळ मिळाली नाही. या दुर्घटनेत माझी आई, पत्नी आणि मुलाचे निधन झाले. एक मुलगा नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक होता आणि दोन मुलींचा विवाह झाला असून, त्या सासरी होत्या. आता गावी मी एकटाच असतो.
Recover your password.
A password will be e-mailed to you.