Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाणारी वाहतूक बंद, गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांना फटका

10

सिंधुदुर्ग : तळकोकणात सध्या दमदार पाऊस पडतोय. या पावसाने अजूनही उसंत घेतलेली नाही .अधूनमधून पावसाचा जोर कायम आहे. या दमदार पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.ग्रामीण भागातील नागरिकांची घरे देखील कोसळली आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहे. तर काही नागरिकांचे प्रशासनाने स्थलांतर देखील केले आहे. ग्रामीण भागातील रस्ते देखील खचले आहेत. ग्रामीण भागामध्ये जाणारी येणारी वाहतूक अजूनही बंद आहे. सध्या पर्यायी मार्गाचा वापर केला जात आहे.सकाळपासून वैभववाडी तालुक्यात अधूनमधून जोरदार पाऊस पडतोय. याचा फटका सिंधुदुर्गातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या भुईबावडा घाटाला बसला आहे. या भागांमध्ये जोरदार अतिवृष्टी होत असल्यामुळे याचा मोठा फटका भुईबावडा घाटाला बसला असून भुईबावडा घाटामध्ये रस्त्याच्या मध्यभागी मोठं भगदाड पडले आहे. सध्या पर्यायी मार्ग म्हणून भुईबावडा घाटाचा वापर केला जात आहे. त्यामुळे या मार्गावरील ये जा करणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ही घटना आज सायंकाळी बुधवारी घडली आहे. या भागामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे.
Gujarat Court: मुस्लिमांवर आर्थिक बहिष्काराचे आवाहन करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करा-गुजरातच्या न्यायालयाचा आदेश

मुख्य करूळ घाटातील वाहतूक नुतनीकणामुळे बंद आहे. त्यामुळे सर्व वाहतूक भुईबावडा घाट मार्गे सुरू आहे. या घाटामध्ये छोटी मोठी पडझड कायम सुरूच आहे.यामुळे हा घाट मार्ग हळूहळू वाहतुकीला धोकादायक ठरत आहे.आज रस्त्याच्या बाजूला असलेल्या भुईबावडा घाटामध्ये मोरीच्या ठिकाणी रस्त्यात भगदाड पडले असून जवळपास ५ ते ६ फुट खोल पडले आहे.या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या स्थितीला हा भुईबावडा घाट वाहतुकीला बंद केला आहे. त्यामुळे सध्या वाहतुकीचा लोड फोंडा घाटावर आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. आगामी गणेशोत्सव देखील काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. चाकरमानी देखील मोठ्या प्रमाणावर या घाटाने येणार आहेत. हा वाहतुकीला सुस्थितीत करणे गरजेचे आहे. अन्यथा सर्व चाकरमान्यांना हा त्रास सहन करावा लागणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.