Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुण्यात माळीण दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची शक्यता, आंबेगावात जमीन सात फूट खचली

6

पुणे : गेल्या १० वर्षांपूर्वी माळीण दुर्घटनेनं संपूर्ण जगाला हादरवले होते. संपूर्ण डोंगराचे भूस्खलन होऊन आंबेगाव तालुक्यातील माळीन हे गाव जमिनीत गाडले गेले होते. त्या घटनेच्या आठवणी ताज्या असतानाच आता माळीण गाव परिसरातील गावांना धोका निर्माण झाला आहे. माळीण परिसरात असलेले पांचाळे खुर्द या गावामध्ये सात ते आठ फूट जमीन खाली गाडली गेली आहे. त्यामुळे या भागामध्ये माळीण घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी या गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागामध्ये असलेले पांचाळे खुर्द हे गाव. डिंभे धरणाच्या बॅक वॉटरजवळ हे गाव आहे. तसेच माळीण गावाच्या देखील अगदी लगत हे गाव आहे. दोन दिवसांपूर्वी या गावातील जमीन गुडघाभर खाली खचली गेली आहे. या गावांमध्ये जवळपास ४५ हून अधिक कुटुंब वास्तव्यास आहेत. जमीन खसली गेल्याने या गावातील ग्रामस्थ भयभीत झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने भूस्खलनाची मोठी भीती निर्माण झाली आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतेही दखल घेतली जात नाहीये. आपत्ती व्यवस्थापनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
Goregaon Couple Death : बायकोचा खून करुन आत्महत्या, मुलाचा गोंधळ उडू नये म्हणून पेडणेकरांनी केलेली सोय, ‘तो’ मेसेज देणार कलाटणी

”भविष्यात जर माळीणसारखी दुर्घटना घडली आणि आमचे संपूर्ण गाव जर भूस्खलनात गाडले गेले. तर याला जबाबदार कोण? असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत. जमीन मोठ्या प्रमाणावर खचल्याने येथील नागरिकांना जीव मोठे धरून राहावे लागत आहे. त्यामुळे आमचे लवकरात लवकर पुनर्वसन करा”, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पुण्यात पावसाचं धुमशान

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणक्षेत्रांसह घाटमाथ्यावर रविवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे प्रकल्पातील टेमघर धरण रविवारी १०० टक्के भरले. खडकवासला ९४ टक्के भरले आहे. उजनी धरण ९० टक्के आणि पुणे जिल्ह्यातील पवना, चासकमान, आंद्रा, नीरा देवघर, वीर, डिंभे ही धरणे ९० टक्क्यांपुढे भरली आहेत. जिल्ह्यातील भाटघर, कळमोडी ही धरणेही १०० टक्के भरली. खडकवासला प्रकल्पातून रविवारी सायंकाळी पाच वाजेपासून ४५ हजार ७०० क्युसेकने आणि जिल्ह्यातील अन्य धरणांच्या पातळीनुसार, विसर्ग करण्यास जलसपंदा विभागाने सुरुवात केली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.