Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विधानसभेसाठी जंगी तयारी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेची घोषणा

6

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज बुधवारी पत्रकार परिषद घेत ‘शिवस्वराज्य यात्रा’ची घोषणा केली आहे. ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्यावरून सुरू होईल अशी माहिती देताना या यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा जनतेपुढे पर्दाफाश केला जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेचा टिझर व लोगोही प्रसिद्ध केला. पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक तथा खासदार अमोल कोल्हे, ज्येष्ठ नेते तथा आमदार अनिल देशमुख, ज्येष्ठ नेते तथा आमदार राजेश टोपे व सुनील भुसारा तसेच आमदार रोहित पवार, आदी नेते तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाण्याच्या वेशीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर

शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेऊन यात्रेची सुरूवात

महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यापासून राज्य अधोगतीकडे गेलेले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शेजारचे राज्य आपल्या तरुणांच्या हातचे काम हिसकावून घेत आहेत. हे सर्व सुरू असताना राज्यकर्ते हतबलपणे बसले आहेत. त्यामुळे आम्ही महायुती सरकारचे काळे कारनामे घेऊन जनतेच्या दरबारात जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेऊन यात्रेची सुरूवात करणार अशी माहिती त्यांनी दिली.
Jayant Patil: गंभीर गुन्हे असलेल्यांना उत्तर देणार नाही; वाझेंच्या आरोपांवर जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

पहिल्या टप्प्यात ७ जिल्ह्यांत यात्रा, दुसऱ्या टप्प्याची लवकरच घोषणा

पहिल्या टप्प्यात दहा दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांतून फिरणार असून लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाणार आहे. तसेच ९ ऑगस्ट हा दिवस निवडण्याचा उद्देश म्हणजे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले जाओ चळवळीचा नारा या दिवशी ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला होता. तसेच त्या दिवशी जागतिक आदिवासी दिवस असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रामध्ये रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या पायवाटेनं आणि आदर्शाने महाराष्ट्र राज्य चालवण्यासाठी राज्यातील जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही जनतेपर्यंत जाणार आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
Sharad Pawar: जुने, नवे हिशोब चुकते करण्याची तयारी; दादा आणि विखेंना धक्का देण्यासाठी शरद पवारांची फिल्डींग

राज्यातील ४८ पैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीचा विजय

लोकसभा निवडणुकीत जनतेने केंद्र व राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील ४८ पैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. आता महाराष्ट्रातील बहाद्दर जनतेने महायुती सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकार घाबरून, वेगवेगळ्या योजनांचा भडीमार करत आहे तसेच सरकारी तिजोरी मोकळी करत आहे. सरकार ज्या घोषणा करत आहे ते जनतेलाही पटत नाही, असे ते म्हणाले.
Prakash Mahajan : अजित पवारच सुपारीबाज, हत्येचा खटला भरा; जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणावरुन प्रकाश महाजन चिडले

हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा- खासदार अमोल कोल्हे

हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा आहे. शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत, त्यांचा आदर्श जागृत करणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रात गद्दारी आणि भ्रष्टाचार यांचे नांगर फिरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीत औरंगजेबाला महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे काय हे दाखवून दिले. आज मात्र दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक होण्यासाठी आमच्या नेत्यांना वेश बदलून जावे लागते, असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणारे आपल्या राज्यातील राज्यकर्ते महाराष्ट्राला काहीही मिळवून देऊ शकले नाही. हा महाराष्ट्रातील शेतकरी आणि तरुणांच्या स्वाभिमानाचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमान दिल्लीच्या अहंकाराविरुद्ध आदराने उभे राहण्याची गरज आहे, ही लढाई एका पक्षाची नाही, ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.