Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुण्यात डेंग्यूचा उद्रेक! वसतिगृहामध्ये १० विद्यार्थ्यांना लागण; डॉ. आंबेडकर वसतिगृहात आरोग्याचा प्रश्न गंभीर

12

म. टा. प्रतिनिधी, पुणे: महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांचा गेल्या आठवड्यात डेंगीमुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी दहा विद्यार्थ्यांना डेंगीची लागण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिका प्रशासनाकडून या विद्यार्थ्यांवर बाणेर येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. वसतिगृहातील अस्वच्छता, ढेकणांचा सुळसुळाट याशिवाय डासांचा प्रादुर्भाव वसतिगृहाच्या परिसरात असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

गंभीर त्रुटी


शहरातील उच्चभ्रू वसाहतीत घोले रस्त्यावर महापालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे. या वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांचा डेंगीमुळे मृत्यू झाल्यानंतर येथील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या. या वेळी त्यांनी सर्वच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये आणखी दहा विद्यार्थ्यांना डेंगीची लागण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. वसतिगृहातील स्वच्छतेकडे लक्ष देण्यात येत असून आवश्यक सुविधा दिल्या जात असल्याची प्रतिक्रिया महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

सर्वत्र ढेकणांचा संचार

महापालिका आयुक्तांनी वसतिगृहाची पाहणी केली असता सर्वत्र ढेकणांचा संचार असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ‘फायरगन’ने डासांची अंडी मारण्याचे आदेश दिले असून, खिडक्यांना जाळ्या बसवणे, विद्यार्थ्यांना मच्छरदाणी पूरविण्याचे आदेश दिले आहेत. वसतिगृहाची साफसफाई, स्वच्छता करण्यात येत आहे. याशिवाय डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. याशिवाय या विद्यार्थ्यांना डेंगीचा डास कुठे चावला, यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या दिनचर्येची माहिती घेण्यात येत असून त्यानुसारही उपाययोजना करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चिंताजनक! राज्यात अतिवृष्टीचे १११ बळी; २४ तासांत तिघांच्या मृत्यूची नोंद, १६३ जण जखमी, तर सहा बेपत्ता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यात दहा विद्यार्थ्यांना डेंगीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या विद्यार्थ्यांवर बाणेर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांना मच्छरदाणी, खिडक्‍यांना जाळ्या बसविणे, ढेकणांचा त्रास होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येत असून, आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. – डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.