
Tej Police Times
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहात जनसंवाद सभा रविवारी झाली. यात मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार संजय कुटे, माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार वसंत खंडेलवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
Solapur News : भाजपचे अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट; काँग्रेस नेत्याचा भाजप आमदारांवर हल्लाबोल
फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीने फेक नरेटिव्ह पेरून भाजपचा मत टक्का कमी करण्याचा प्रयत्न केला. आरक्षण काढून टाकू, संविधान बदलणार अशा खोट्या प्रचारामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या. पण, लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ४३.९ टक्के तर महायुतीला ४३.६ टक्के मतदान झाले. या मतांच्या टक्क्यांत केवळ ०.३ इतका फरक आहे. केवळ दोन लाख मते कमी मिळाली.
महाविकास आघाडी १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार, शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी जयंत पाटलांचा हुंकार
अकोल्यात सध्या पाचपैकी चार आमदार भाजपचे आहेत. पाचही आमदार भाजपचे रहावे यासाठी प्रयत्न करा, भाजपपासून दुरावलेल्या सर्वसामान्य मतदारांना जोडा, जनसंवाद वाढवा, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सामाजिक क्षेत्रातील व सामान्य नागरिकांशी कनेक्ट होऊन जनाधार वाढवावा, अशा सूचना दिल्या.
लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर महाविकास आघाडीसह महायुतीचे घटक पक्ष आता विधानसभा निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. भाजपने जिल्हानिहाय प्रभारींच्या नियुक्त्या करीत, बैठकांवर जोर दिला आहे. तर अजित पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची जनसंवाद यात्रा जिल्ह्यात येऊन गेली. शिवसेना शिंदे गटाकडूनही विधानसभानिहाय प्रभारी आणि निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यातील मतदारसंघाचे दौरे सुरू केले आहेत. काँग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. त्यापाठोपाठ आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.