
Tej Police Times
विनायक राऊत यांच्यानंतर कोकण दौऱ्यावर असलेले मिलिंद नार्वेकर मंगळवारी रात्री पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून आढावा घेणार आहेत. शिवसेना ठाकरे गटात रत्नागिरी-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघामध्ये इतर पक्षातून आयात केला जाणारा उमेदवार नेमका कोण असणार? याबाबत सध्या वेगवेगळी नावे आणि चर्चा सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडीकडून राजापूर मतदारसंघावर राजन साळवी यांच्या विरोधातील काँग्रेसमधील नाराजी उघड आहे. यावरही मिलिंद नार्वेकर कोणती मात्रा देतात हेही महत्त्वाचे आहे. राजन साळवी हे ठाकरे गटाशी निष्ठावान राहिलेले शिवसेनेतील कोकणातील ज्येष्ठ आमदार आहेत.
Ratnagiri News : मिलिंद नार्वेकर अदृश्य हातामुळे निवडून आले, माझ्यासाठी एक असाच अदृश्य हात हवा; उदय सामंत यांचा मिश्किल अंदाज
विधानसभेच्या चाचपणीसाठी खास करून मिलिंद नार्वेकर हे रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आल्याचे बोलले जाते. विधान परिषद निवडणुकीत मिलिंद नार्वेकर यांचा विजय हा त्यांच्या मागे असलेल्या अदृश्य हातामुळे झाला, असे उदय सामंत यांनी यापूर्वी दोन-तीन वेळा म्हटले. आता उदय सामंत यांच्या निवडणुकीत कोणता अदृश्य हात त्यांना धक्का देतो की निवडून आणण्यासाठी मदत करतो हेही स्पष्ट होणार आहे.
Ratnagiri Vidhan Sabha: लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेसाठीही कोकणात शीतयुद्ध रंगणार? रत्नागिरीच्या जागांवर दावे-प्रतिदावे
ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचे सर्वपक्षीय संबंध लक्षात घेता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी कोणत्या उमेदवाराला ते प्राधान्य देतात, यावर पुढील गणिते अवलंबून असतील. राजापूरचे विद्यमान आमदार राजन साळवी, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय बने ही दोन नावे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहेत. मात्र राजन साळवी यांनी रत्नागिरीतून निवडणूक लढवण्यास यापूर्वीच असहमती दर्शवली आहे.
Mahayuti in Vidhan Sabha: लोकसभेत सपाटून हार, आता विधानसभेसाठी ‘अब की बार, २०० पार’, महायुतीचा काय आहे प्लॅन?
राजन साळवी ज्या राजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत, त्या मतदारसंघावर काँग्रेसकडून अविनाश लाड यांनी दावा केला आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात राजापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्यास विद्यमान आमदार राजन साळवी यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा पर्याय उपलब्ध आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यास आपण उदय सामंत यांच्यासमोरही निवडणूक लढवू, असे विधान यापूर्वी ठाकरे गटाचे नेते, गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केले होते. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या नावाचाही विचार हा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी केला जाऊ शकतो.
Ratnagiri News : कोकणात चिपळूणच्या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाचा दावा, अजितदादा गटाच्या आमदाराची डोकेदुखी वाढणार?
मिलिंद नार्वेकर दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांच्यासमोर उमेदवार शोधण्यासाठी ते खास करून कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. दुसरीकडे उदय सामंत यांच्यासमोर लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार व शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांचेही नाव चर्चेत आहे.
लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते नारायण राणे यांना मताधिक्य मिळालेले नाही. याची सल भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे सामंत यांच्यासमोर ठाकरे गटाने तगडा उमेदवार दिल्यास सामंत यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.
Recover your password.
A password will be e-mailed to you.