
Tej Police Times
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी आरतीचा केतनशी विवाह झाला होता. आरती ही मूळची नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी जवळील काळुस्ते गावची रहिवासी आहे. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी आरतीला टोमणे मारण्यास सुरूवात केली. लग्नाच्या वेळी आमचा मानपान केला नाही. नवीन घरासाठी माहेरहून २० लाख रूपये आण. तुला चांगला स्वयंपाक करता येत नाही, अशाप्रकारे आरतीला दररोज त्रास दिला जात असे.
सातत्याने होणाऱ्या जाचाला आरती कंटाळली होती. हा सारा प्रकार तिने माहेरच्यांना सांगितला होता. दिवसेंदिवस त्रास वाढू लागल्याने आरतीने शनिवारी रात्री टिटवाळ्यातील सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरतीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवला. आरतीचा भाऊ जनार्दन घारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. कल्याण जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सर्वांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Recover your password.
A password will be e-mailed to you.