
Tej Police Times
शिशुपाल पटले यांनी भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवले होते. २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पटलेंनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटलेंनी दिलेला राजीनामा हा भंडारा जिल्ह्यातील भाजपसाठी मोठा धक्का मानला जातो आहे.
Ajit Pawar Confession : सुप्रियांविरुद्ध सुनेत्रांना उभं करायला नको होतं, अजित दादांची खंत, माझं मन मला सांगतंय…
शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारकडे आपण पाठपुरावा करत होतो, मात्र राज्य सरकार आणि सत्तेत सहभागी असलेल्या पक्ष नेतृत्वाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळेच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी स्पष्ट केले होते. जनसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचे तोंड पहावे लागले. ही बाब पक्ष नेत्यांच्या ध्यानात आणून दिली होती. मात्र पक्षामध्ये जुन्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे. भाजपमध्ये लोकशाहीचा अस्त झाला. ज्यांनी भाजपची स्थापना केली त्यांच्या विचारांनाच आताच्या नेत्यांनी तिलांजली दिली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील भाजपा आता राहिली नाही. खऱ्या कार्यकर्त्यांचा भाजपला विसर पडू लागला आहे. कर्मठ सामान्य कार्यकर्त्याची किंमत पक्षाला नाही. सामान्य कार्यकर्त्यांना पक्षात राहून न्याय देता येत नसेल, तर काय उपयोग? अशी खंत शिशुपाल पटले यांनी भाजप सोडताना व्यक्त केली होती.
Recover your password.
A password will be e-mailed to you.