
Tej Police Times
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सायंकाळी ही घटना घडली आहे. मडगावकडून मुंबईकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस समोरच त्या युवकाने रेल्वे पुलावरुन उडी घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. रत्नागिरी शहराजवळील डी मार्ट येथील रेल्वे पुलावरून उडी घेत तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (१५ ऑगस्ट २०२४) संध्याकाळी घडली हा सगळा प्रकार समजतात याप्रकरणी घटनास्थळी रत्नागिरी पोलीस व नागरिकांनी धाव घेतली. याप्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून या आत्महत्या प्रकरणाची चौकशी रत्नागिरी पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Kolkata Case: कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणात महिला इंटर्नचं कनेक्शन? १५० ग्राम वीर्य, ४-५ जणांचा सहभाग अन्…
या घटनेची माहिती मिळताच तातडीने ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक निखारर्गे, शिवगण, हवालदार मंदार मोहिते, हवालदार रुपेश भिसे, हवालदार रोशन सुर्वे, अजय कांबळे आदी पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतुदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने पोलिसांना मृतदेहाचे तुकडे गोळा करावे लागले. याप्रकरणी आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात झाली आहे. संबंधित तरुणाने आत्महत्या का केली, तसेच आत्महत्येपूर्वी त्याचे बहिणीसोबत नेमके कोणत्या विषयावर बोलणे झाले, याबाबतही पोलीस माहिती घेत आहेत.
सुरेंद्रला दारुचे व्यसन होते अशीही प्राथमिक माहिती मिळत आहे. गुरुवारी साडेचार वाजताच्या सुमारास सुरेंद्र कुवारबाव येथील डी मार्टच्या जवळ असणाऱ्या रेल्वे पुलावर आला. तिथून त्याने आपल्या बहिणीला व्हिडिओ कॉल करुन आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर काही क्षणातच त्याने रेल्वे पुलावरून जाणाऱ्या रेल्वे गाडीवर उडी घेत आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांना घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.
Recover your password.
A password will be e-mailed to you.