
Tej Police Times
देशभरातील १५० प्रमुख धरणांवर केंद्रीय जल आयोगाकडून देखरेख ठेवली जाते. त्यामध्ये महाराष्ट्रातीलच सर्वाधिक ३२ धरणांचा समावेश आहे. या ३२ धरणांमध्ये जुलैअखेरीस सरासरीच्या पाच टक्के अधिक जलसाठा होता. तो साठा आता १० टक्क्यांवर गेल्याचे समाधानकारक चित्र आहे. जुलैअखेरीस जायकवाडी, भीमा (उजनी) व गिरणा या धरणांमधील जलसाठा सरासरीच्या ५० टक्क्यांहून कमी होता. सातारा जिल्ह्यातील उरमोडी व पुणे जिल्ह्यातील भीमा आस्खेड या दोन धरणांमधील साठा हा सरासरीच्या ५० ते ८० टक्क्यांदरम्यान होता. आता मात्र चित्र सकारात्मक आहे.
Weather forecast : पावसाची ओढ, उकाड्यात वाढ, महाराष्ट्राची काहिली; पुढील दोन आठवड्यासाठी IMD चा हवामान अंदाज काय?
आयोगाच्या शुक्रवार, १६ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार, राज्यातील या ३२ पैकी एकाही धरणात सरासरीपेक्षा ५० टक्क्यांहून कमी जलसाठा नाही. सरासरीच्या तुलनेत सर्वांत कमी साठा जायकवाडीमध्ये आहे. बहुतांश धरणे सरासरीच्या तुलनेत ८० ते ९० टक्के भरलेली आहेत. भीमा (उजनी), वीर ही धरणे सरासरीच्या १०० टक्के भरली आहेत. तर १३ धरणांमध्ये सरासरीच्या तुलनेत ९० टक्क्यांहून अधिक जलसाठा आहे.
धरणे एकूण कमाल क्षमता (अब्ज घन मीटर) सध्या मागील वर्षी सरासरी सरासरीच्या तुलनेत
१९.१६६
१४.९४८
१३.३२७
१३.५७५
१०.११ टक्के अधिक
Recover your password.
A password will be e-mailed to you.