तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

कृषी क्षेत्रातील पदवी नाही, पण शेतीतील प्रयोगाने फुलवली कारल्याची शेती; लाखोंचं उत्पन्न

0 46

निलेश झाडे, चंद्रपूर : कारलं कडू असतं, पण औषधीयुक्त असतं असं बोललं जातं. त्यामुळे बाजारात कारल्याला मोठी मागणी असते. हे कडू कारलं एका शेतकरी कुटुंबासाठी गोड ठरलं आहेत. बाप-लेकाने कारल्याची शेती केली. या शेतीतून त्यांना लाखोंचा नफा झाला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या वेजगाव येथील या बाप-लेकाचं नाव आहे बाबुराव आस्वले, दीपक आस्वले. अवघ्या दीड एकारात त्यांनी कारल्याची लागवड केली होती. शेती नफ्याची नाही, अशी ओरड अधूनमधून ऐकायला येते. मात्र काही शेतकऱ्यांनी शेतीत नवीन प्रयोग करून शेतीला फायदेशीर केलं आहे.

कारल्याची यशस्वी शेती

चंद्रपूर जिल्हातील मागासलेला तालुका अशी ओळख असलेला गोंडपिपरी उद्योग नसलेला तालुका. केवळ शेती येथील मुख्य व्यवसाय. तालुक्याला वर्धा, वैनगंगा, अंधारी नद्यांनी वेढा दिला, खरा मात्र एकही मोठा सिंचन प्रकल्प येथे नाही. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका येथील शेतीला बसत असतो. पिकली तर शेती, नाहीतर माती अशी येथील अवस्था. या साऱ्या संकटावर मात करत काही शेतकऱ्यांनी शेतीत उंच भरारी घेतली आहे.
Nanded News : नांदेडच्या शेतकऱ्याचा पावसाळी रानभाजी कर्टुले लागवडीचा यशस्वी प्रयोग, चार महिन्यात लाखोंचं उत्पन्न

पिता-पुत्राचा शेतात नवा प्रयोग

वेजगाव येथील शेतकरी पिता, पुत्राची चर्चा सध्या होत आहे. बाबुराव आस्वले हे ६५ वर्षाचे, पण त्यांची शेतीची ओढ सुटलेली नाही. मोठा मुलगा दीपक यांच्या सोबतीने ते शेतात नवीन प्रयोग करत असतात. दोन एकर जागेत ते मिर्ची, भाजीपाल्याचं पिक घेतात. यावर्षी त्यांनी दीड एकर जागेत कारलं पिकाचं उत्पादन घेतलं.

गावातील परशुराम लेडांगे यांनी कारलं पिकाचा प्रयोग केला होता. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश आलं. दीपक आस्वले यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि कारल्याची लागवड केली. कारलं पिकासाठी पन्नास हजार रुपये खर्च आल्याचं त्यांनी सांगितलं. पिक चांगलं जमून आलं. आतापर्यंत त्यांनी एक लाखाचं कारलं चंद्रपूरचा बाजारात विकलं आहेत. पुन्हा एक ते दीड लाखाचं उत्पादन होणार, अशी त्यांना आशा आहे.
वावर हाय तर पावर हाय, राज्यात सर्वांवर भारी कोल्हापुरी, एकरी १५० टनाचं उत्पादनं; विमलाताईंची भन्नाट स्टोरी

शेतीत वडील, पत्नी, भाऊ सर्वांचीच मदत

दीपक यांनी शेतात बोअरवेल मारली आहे. यातून ते शेत पिकांना सिंचन करतात. टोमॅटो, ढेमसे, काकळी, मिरची आणि पालेभाज्यांची ते लागवड करतात. शेतकामात त्यांना वडील, पत्नी, लहान भावाची मदत होत असते. कृषी क्षेत्रातील कुठलीही पदवी नसताना केवळ अनुभवाच्या जोरावर पिता, पुत्र शेती फुलवत आहेत. दिवसभर शेतात घाम करणाऱ्या आस्वले कुटुंबांनी शेतीतूनच आर्थिक प्रगती साधली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.