
Tej Police Times
सध्या जाणवत असलेली उन्हाची काहिली संपूर्ण महाराष्ट्रभर मंगळवारपर्यंत कायम राहिल, तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन ते सहा अंशांपर्यंत अधिक जाणवू शकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशीव अशा २१ जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा पाच ते सहा अंशांनी अधिक जाणवण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. उर्वरित मराठवाडा व संपूर्ण विदर्भातील १५ जिल्ह्यांत हे तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांनी अधिक जाणवू शकते. पावसाळ्याच्या काळातील अरबी समुद्रावरून, पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलून हे वारे सध्या उत्तरेकडून येत आहेत. बाष्पयुक्त वारे वाहत नसल्याने पावसामध्ये खंड पडला आहे. वाऱ्याचा मंदावलेला वेग आणि हवेचे गाठोडे निर्माण होऊन त्यातून उष्णतेचे संचयन होत आहे. ढगाळ वातावरणामुळे रात्री जमिनीतून आकाशात सामावू शकणाऱ्या उष्णतेलाही सध्या अटकाव होत आहे. पर्यायाने संचित झालेली ही उष्णता काहिलीला मदत करत आहे, अशीही माहिती खुळे यांनी दिली.
Recover your password.
A password will be e-mailed to you.