Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोकणात भाजप पदाधिकारी आक्रमक, रामदास कदम यांना इशारा, सेना भाजपमधील संघर्ष तीव्र

11

प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांपूर्वीच महायुतीमध्येच खडाखडी सुरू झाली आहे. शिवसेनेचे नेते माजी पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांचा जाहीर निषेध व्यक्त करत घोषणा दिल्या. त्यामुळे गेले अनेक वर्ष रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या शिवसेना भाजपमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

रामदास कदम यांच्या या वक्तव्याचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीत उमटणार असल्याच्या शक्यतेवर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांचे सुपुत्र योगेश कदम यांना निवडणुकीत रामदास कदम यांच्या वक्तव्याचा त्रास होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेली ही वर्चस्वाची लढाई कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातूनच रामदास कदम यांनी भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या तोफ डागल्याने याला वेगवेगळे संदर्भ असल्याचेही बोलले जाते. गेल्या वेळेला शिवसेना भाजप युती असतानाही भाजपने विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीचे संजय कदम यांचे काम केलं होतं. त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाची भूमिका पुन्हा एकदा महत्वाची ठरणार आहे.
Ramdas Kadam vs Ravindra Chavan : तोंड सांभाळून बोला, नाहीतर तोंड फोडू; रामदास कदम यांच्या ‘कुचकामी’ टीकेवर रवींद्र चव्हाण यांचा इशारा

नौटंकी बंद करा

यांना महायुतीमध्ये बेबनाव करायचा आहे. यांचे काहीतरी वेगळेच चालू आहे, असा आरोपही केदार साठे यांनी दापोलीत आयोजित पत्रकार परिषदेत केला. रामदास कदम यांना आमचा अंतिम इशारा आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या कार्यालयात जायचे, त्यांच्याकडून कामे मंजूर करून आणायची, निधी आणायचा आणि त्यांच्यावरच पलटवार करायचा ही नौटंकी आता बंद झाली पाहिजे, अशा शब्दात भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी रामदास कदम यांना सुनावले आहे.
कोकणातून उद्धव ठाकरेंना हद्दपार करु, सत्ता महायुतीचीच येणार; आमदार योगेश कदमांचे विधान

टीका कराल तर भाजपचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत

रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी आज जाहीर पत्रकार परिषदेत घेऊन रामदास कदम यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. आमच्या नेत्यावर टीका करीत असाल तर भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता गप्प बसणार नाही. रामदास भाई तोंड सांभाळून बोला, आमच्या नेत्यांबाबत केलेली आक्षेपार्ह विधाने आम्ही खपवून घेणार नाही. दापोली विधानसभा मतदारसंघ ही तुमची एकट्याची जहागिरी नाही, सगळीकडे फक्त मीच असा विषय चालणार नाही. तुम्ही आमचे नेते रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राज्याचे भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहात तर मग तुम्ही जाहीर टीका का करता? त्या तक्रारीला उत्तर देण्यासाठी रवींद्र चव्हाण सक्षम आहेत अशा शब्दात त्यांनी सुनावले आहे.
Vidhan Sabha : युतीच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! ठाकरेंच्या शिलेदाराविरोधात गुहागरमध्ये माजी आमदार रिंगणात

योगेश कदमांनाही सुनावले

रामदास कदम शिवसेनेचे नेते म्हणून पत्रकार परिषद घेतात आणि प्रत्येक पत्रकार परिषदेत ते मुलगा म्हणून आमदार योगेश कदम यांची बाजू घेऊन भांडत आहेत. आमचे नेते रवींद्र चव्हाण यांच्याबाबत वारंवार अनुद्गार रामदास कदम यांनी काढले. विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्या विषयानंतर आता त्यांचा मुलगा आमदार योगेश कदम त्यांनी एकदा त्यांची या सगळ्या विषयात भूमिका स्पष्ट करावी की त्यांचेही हेच मत आहे का? असे साठे म्हणाले.

रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम हे दापोली- खेड- मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून ते उमेदवार असणार आहेत. मात्र त्यापूर्वीच महायुतीत शिमगा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कोकणात एकंदरीतच महायुतीमध्ये वर्चस्वाची लढाई निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.