
Tej Police Times
बांगलादेशमध्ये झालेला हिंदूंवरील हल्ला हा फक्त हिंदू धर्मियांवरील हल्ला नसून, हा हल्ला सगळ्या भारतीयांवरील आहे. बांगलादेशमध्ये झालेले बंड हे मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे. हिंदुस्थानचे मित्र शासक असलेल्या शेख हसीना यांची भारताशी असलेली सलगी, भारत धार्जिणे धोरण आवडत नसल्यानेच बांगलादेशमध्ये असलेल्या कट्टरपंथीयांना प्रोत्साहन देऊन हे बंड घडून आणले गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्याविरोधात भारत एकजुटीने उभा आहे, असे दिसले पाहिजे त्यामुळे सगळ्या संघटनांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विशेष सरकारी वकील अॅड. शिशिर हिरे यांनी केले.
मराठ्यांनी आरक्षण मागावं का? आरक्षण कुठलं काढलंय? तुम्ही उभा देश सांभाळायचा : संभाजी भिडे
बैठकीला सुरेश निकम, डॉ. तुषार शेवाळे, संजय दुसाने, नीलेश कचवे, रामा मिस्तरी, मनोहर बच्छाव, किशोर इंगळे, नितीन पोफळे, जगदीश गोऱ्हे, प्रमोद पाटील, मुकेश परदेशी, दिलीप शेवाळे, जितेंद्र अहिरराव, मदन गायकवाड, राजेंद्र सूर्यवंशी, दुर्गेश कोते आदी उपस्थित होते.
‘बांगलादेशमधील हिंदूंचे रक्षण करू’- महंमद युनूसपंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी लाल किल्ल्यावरून भाषण करताना, बांगलादेश सरकारने तेथील हिंदूंची काळजी घ्यावी, असे आवाहन केले होते. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पदच्युत झाल्यानंतर युनूस यांनी बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागारपद स्वीकारले आहे. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोदी आणि युनूस यांच्यात प्रथमच संवाद झाला. मोदींनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांनी युनूस यांच्याशी बोलताना लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांगलादेशला भारताचे समर्थन असल्याचा पुनरुच्चार केला. ‘प्रा. महंमद युनूस यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला. आम्ही प्रचलित परिस्थितीवर विचारविनिमय केला. त्यांनी बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याची ग्वाही दिली’, असे मोदी यांनी म्हटले आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.