तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

बदलापूर शाळेत चिमुरडींवर अत्याचार, गुन्हा घडला तिथे फाशी द्या, पालकांचा संताप, अंधारे गहिवरल्या

0 37

बदलापूर : बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुरड्यांवर शाळेतच लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. सात दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत कुठलीच कारवाई न झाल्याने अखेर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. तर शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांची ने-आण करण्याची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांचे निलंबन केले आहे. आमच्या लेकीबाळी सुरक्षित आहेत का? असा संतप्त सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. तर जिथे गुन्हा घडला तिथे फाशी द्या, अशी मागणी पालकांनी केली आहे. पालकांनी शाळेला घेराव घालत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

बदलापूरच्या शाळेतील चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाचे शहरात पडसाद उमटताना दिसत आहेत. बदलापूर रेल्वे ट्रॅकवर पालकांनी आंदोलन केलं असून त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर शहरातील रिक्षाही बंद आहेत.
Badlapur Crime News: बदलापुरात चार वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर शाळेतच अत्याचार, शेकडो पालक रस्त्यावर उतरले, शाळेचा माफीनामा

सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया

“काल राखी पौर्णिमा होती आणि कालच्याच दिवशी ही दु्र्दैवी घटना लक्षात आली. अत्याचार झालेल्या एका बालिकेचं वय तीन वर्ष आठ महिने आहे, तर दुसरीचं साडेसहा वर्ष. जर शाळेतील प्यूनच अशाप्रकारे दुष्कर्म करत असेल तर लेकीबाळी सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित होतो. एक आई म्हणून आम्हालाही काळजी वाटते, की आमची लेकरं कुठे सुरक्षित आहेत” अशा भावना सुषमा अंधारे यांनी व्यक्त केल्या.
Badlapur News: चिमुरड्यांवर अत्याचार, पालक संतप्त, बदलापूर रेल्वे ट्रॅकवर लोकांचे जत्थे; लोकल रोखल्या, रिक्षा बंद
“कल्याणमध्ये सात वर्षांच्या लेकरावर चाकूचे सपासप वार झाल्याचं समोर आलं आहे. आमची मागणी आहे की शाळेच्या बाजूला पोलीस चौकी असावी, पाचशे मीटर अंतरावर पोलिसांची गस्त असावी. सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, विश्वासाने वाढवणाऱ्या मावशांची नेमणूक करावी. लाखो रुपयांची फी घेताना सुरक्षेची जबाबदारी शाळेची असते, हे लक्षात घ्यायला हवं” असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

पालकांचा संताप

जिथे गुन्हा घडला तिथे फाशी द्या, अशी मागणी काही पालकांनी केली आहे. “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, कशासाठी? रेप करण्यासाठी का?” असा डोळ्यात पाणी आणणारा सवाल एका माऊलीने विचारला. “मुलांना कोणाच्या भरोशावर आम्ही शाळेत पाठवायचं? न्याय मिळेपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही. हे लोकप्रतिनिधी कुठे गेले? आम्हाला ते आज इथे हवे आहेत. पुढच्या मंगळवारी दहीहंडीला सेलिब्रिटी नाचवून गर्दी जमवतील, बॅनरबाजी करतील, ते आम्हाला नको, राजकारण्यांनी आज यावं” अशी मागणी पालकांनी केली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.