तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

राखी अखेरची ठरली! रक्षाबंधन साजरं करुन मित्रांसोबत धरणावर गेला अन्… बहिणीचा आक्रोश पाहवेना

0 39

निलेश पाटील, जळगाव: सकाळीच लाडक्या बहिणीने आपल्या भावाला रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी राखी बांधली. राखी बांधल्यानंतर भाऊ तालुक्यातील निंबादेव धरणावर मित्रांसह पोहायला गेला. मात्र, तरुणाचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. ज्याला सकाळी राखी बांधली तो भाऊ आता पुन्हा कधीच दिसणार नाही, हे कळताच बहिणीने मोठा आक्रोश केला.

भाऊ बहिणीचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. मात्र, याच पवित्र रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहीण एकमेकांपासून नेहमीसाठी लांब झाले. सकाळी बहिणीच्या हातून राखी बांधून मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा निंबादेवी धरणाच्या सांडव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. वेदांत सुवर्णसिंग पाटील (वय २० राहणार निमगाव तालुका यावल) असे मृत तरुणाचे नाव आहे.
Badlapur News: चिमुरड्यांवर अत्याचार, पालक संतप्त, बदलापूर रेल्वे ट्रॅकवर लोकांचे जत्थे; लोकल रोखल्या, रिक्षा बंद
यावल तालुक्यातील सावखेडा सिम जवळ निंबादेवी धरण आहे. वेदांत याने सकाळी दहा वाजेच्या सुमारास आपल्या लाडक्या बहिणीकडून राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं. रक्षाबंधनची सुट्टी असल्याने तो आपल्या मित्रांसह निंबादेवी धरणावर गेला होता. मात्र, तिथे प्रवेश बंद होता. शिवाय पोलीस बंदोबस्त ही होता. त्यामुळे वेदांत आणि त्याचे मित्र धरणाच्या सांडव्यात असलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. तेथे एका खड्ड्यात वेदांचा पाय घसरला तो खोल पाण्यात बुडून बेपत्ता झाला.

जसा वेदांत पाण्यात बुडाला काही वेळातच मित्रांनी त्याला शोधून बाहेर काढले. पण, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याला तातडीने किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथून जळगाव आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल तायडे यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्याच्यावर मंगळवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दरम्यान, आपल्या सोबतच्या मित्रांचा डोळ्यादेखत जीव गेल्याने त्याच्या मित्रांना शोक अनावर झाला.

बहिणीचा होता एकुलता एक भाऊ

रक्षाबंधनच्या दिवशी बहीण-भावांच्या नात्यात विर्जन पडणारी घटना घडली सकाळीच रक्षाबंधन साजरी करण्यासाठी बहिणीने भावाला दुकानातून राखी आणले आणि भावाच्या हातावर बांधून रक्षाबंधन साजरे केले. हा आनंदाचा दिवस असल्याने घरात आनंद होता. राखी बांधल्यानंतर दुपारी मित्रांसोबत पोहायला गेला मात्र बहिणीने बांधलेली राखी ही अखेरची ठरली. भावाचा मृत्यूची बातमी बहिणीच्या कानावर पडतातच बहिणीने मोठा आक्रोश केला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.