
Tej Police Times
या देशाच्या स्वातंत्र्यानंतर एक नवी पिढी देश सावरण्यासाठी काँग्रेसचे नेतृत्व हातात घेऊन यशस्वी झाली, त्यात राजीव गांधींचा उल्लेख प्रकर्षाने करावा लागेल. त्यांचा जन्म मुंबईत झाला होता. हा दिवस मुंबईत साजरा होत आहे याचा मला आनंद आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले. संसदेत नेहरू कुटुंबावर टीका केली जाते. ज्यांनी आपले सर्वस्व देशासाठी दिले, चार पिढ्या देशासाठी दिल्या, अशा व्यक्तीच्या कुटुंबांबद्दल एक प्रकारची आकसाची भूमिका देशाचे पंतप्रधान आणि सहकारी घेतात हे दुर्दैवी आहे, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली. त्यांनी काहीही टीका केली तरी देशाच्या इतिहासातील नेहरू आणि त्यांच्या कुटुंबाचे योगदान कुणीही पुसू शकत नाही, असे ते म्हणाले. माणसे कळायला वेळ लागतो. राजीव गांधी कळायला वेळ लागला, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.