
Tej Police Times
वेल्समधील ‘पुस्तकांचे गाव’ या संकल्पनेच्या धर्तीवर राज्य सरकारने ही योजना अमलात आणली. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भिलार येथे पहिले ‘पुस्तकांचे गाव’ आकारास आले. या संकल्पनेचे स्वागत झाले. त्यामुळे या योजनेच्या विस्ताराचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार पुणे विभागातून औदुंबर (जि. सांगली), औरंगाबाद विभागातून वेरूळ, नागपूर विभागातून नवेगाव बांध (जि. गोंदिया) आणि कोकण विभागातून पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) या चार गावांची ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून निवड करण्यात आली होती. त्या पाठोपाठ आता नाशिक महसूल विभागातून जळगाव जिल्ह्यातील साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेरला ‘पुस्तकांचे गाव’ बनण्याचा मान मिळणार आहे.
सुसज्ज दालने
या योजनेअंतर्गत अमळनेर येथे विविध प्रकारच्या साहित्य, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवास वर्णनपर ग्रंथांनी सुसज्ज अशी दालने उभी केली जातील. ही रचना उभी करताना त्यामध्ये स्थानिक गावकऱ्यांचा सहभाग घेतला जाईल. यातून वाचनसंस्कृती रुजविण्यासह मराठी भाषा, साहित्याचे जतन, प्रसार आणि प्रचाराबरोबरच पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.
Kolkata Case: कोलकाता प्रकरणाचा फटका, संपामुळे रुग्णसंख्येत घट; महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ससूनचा मोठा निर्णय
अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा
अमळनेरला नुकताच ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजनाचा मान मिळाला होता. त्या पाठोपाठ ‘पुस्तकांचे गाव’साठी निवड झाल्याने अमळनेरच्या शिरपेचाच आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अमळनेर ही साने गुरुजी यांची कर्मभूमी तसेच साहित्यनगरी म्हणून परिचित आहे. ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून मान मिळाल्याने त्यातून वाचनसंस्कृती रुजविण्याचे काम करण्यात येईल.– नीरज अग्रवाल, उपाध्यक्ष, खान्देश शिक्षण मंडळ
Recover your password.
A password will be e-mailed to you.