तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

बदलापुरातील आरोपीचे हातपाय तोडा,लिंग छाटून आणा; इतक्या लाख रुपये बक्षीस देतो- राजकीय नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

0 34

सोलापूर: बदलापूर आणि कोलकाता मधील घटनेने भारत देश आणि महाराष्ट्र राज्यात संतापाची लाट उसळली आहे. सोलापुरातील एमआयएम नेते रियाज खरादी यांनी संताप व्यक्त करत,सौदी अरेबिया देशाप्रमाणे कायदा भारतात लागू करा. सौदी अरेबिया देशात बलात्कार करणाऱ्याला आरोपीस चार ते पाच दिवसात गोळ्या घालून ठार केले जाते. गुन्हा करणाऱ्या आरोपीस भर चौकात दगड मारून ठेचल जाते. चोरी करणाऱ्यांचे हातपाय तोडले जातात. त्याचप्रमाणे कायदा भारतात लागू झाला तर असे कृत्य होणार नाही, असे मत एमआयएम नेते रियाज खरादी यांनी मांडले.

बदलापूर मधील आरोपीचे लिंग छाटून आना,त्याचे हातपाय तोडून आणा त्यांना दहा लाख रुपयांचे बक्षीस देतो, असे जाहीरपणे एमआयएम नेत्याने माहिती दिली आहे.
Supriya Sule: राज्याचे गृहमंत्री दिल्लीत असतात कारभार कोण पाहतं हेच कळत नाही; सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

कोलकाता आणि बदलापूर येथील घटनांमध्ये संशयीत आरोपी हे मुस्लिम समाजातील असते तर अनेक हिंदू संघटना यांनी मुस्लिम समाजाला टार्गेट करत,मोठं मोठी आंदोलने केली असती.सोलापुरातील एमआयएम नेते रीयाज खरादी यांनी आव्हान केले आहे. या हिंदू संघटना आता गप्प का आहेत.त्यांनी आवाज उठविला पाहिजे.आंदोलने करायला पाहिजे असे आवाहन एमआयएम नेत्याने केले.हिंदू संघटनांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी बदलापूर मधील आरोपीचा आणि कोलकाता घटनेतील आरोपीचे हातपाय तोडून आणून दिले किंवा त्यांचे लिंग छाटून आणले तर त्यांना दहा लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले आहे.
Team India: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची नाही म्हणून असे केले का? टीम इंडियाचे सलग दुसरे विजेतेपद मिळण्याचे स्वप्न भंगणार!

मुस्लिम शरिया कायदा लागू करा

एमआयएम नेते रियाज खरादी यांनी मुस्लिम शरिया कायद्याची आठवण करून दिली.शरिया कायद्यात असे कृत्य करणाऱ्या आरोपींना दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा आहे.चोरी करणाऱ्याचे हातपाय दंडापासून तोडले जातात.तसा कायदा भारतात लागू केला तर, असे गुन्हे घडणार नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया रियाज खरादी यांनी दिली आहे.

कोलकाता आणि बदलापूर येथील घटनेनंतर राज्यातील अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घडल्याचे समोर येत आहे. बदलापूर घटनेवर राज्यातील महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.