तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Ajit Pawar: महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचे xxx…; दादांनी हातवारे करून सांगितलं, अत्याचार करणाऱ्यांच परत धाडस झालं नाही पाहिजे!

0 34

Violence Against Women: गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
इंदापूर (दीपक पडकर): कोल्हापूर, बदलापूर, अंबरनाथ, दौंड तालुक्यातील मळद असेल अशा ठिकाणी मानवतेला काळीमा फासणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. नात्यातील लोक देखील विकृत बनत चालले आहेत. त्यांचा योग्य असा बंदोबस्त झाला पाहिजे की, शब्दप्रयोग न करता हातवारे करत दोन बोटांची कात्री करत, तीव्र प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आज इंदापुरात दाखल झाली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर हे उपस्थित होते.
Maharashtra Bandh: उद्याचा बंद बेकायदेशीर! मुंबई उच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला दणका; बंद केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश

पुढे बोलताना पवार म्हणाले की, कोल्हापूर मध्ये सख्या मामानेच हे कृत्य केले. बदलापूर, अंबरनाथ तसेच दौंड तालुक्यातील मळद येथे ही अशा घटना घडल्या आहेत. परंतु २४ तासात या घटनांवर निकाल झाला पाहिजे. अशा स्वरूपाची व्यवस्था आता कार्यान्वित करण्याची गरज असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचे xxx… असा गंभीर इशारा पवारांनी ( शब्दप्रयोग न करता हातवारे करून) दिला.
Maharashtra Bandh : ठाकरेंकडून महाराष्ट्र बंदची घोषणा, पवारांनी कोर्टाच्या निर्णयानंतर बंद मागे घेण्याचं आवाहन केलं

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून महिला अत्याचारांच्या घटनात वाढ होत आहे. अगदी अल्पवयीन मुलींचा अत्याचाराला बळी जात आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा नराधमांन बाबत गंभीर इशारा दिला असून २४ तासाच्या आत निकाल लागेल अशी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी बंदची हाक दिली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना बंद पुकारता येणार नाही असे सांगत हा बंद बेकायदेशीर असल्याचे सांगितले. तसेच बंद केला तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सरकारला तसेच पोलीस प्रशासनाला दिले. महाराष्ट्र बंद पुकारल्यास राज्याच्या अर्थकारणावर परिणाम होऊन मोठे नुकसान होईल. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य सेवा आणि अत्यावश्यक सेवा यासह अनेक बाबींवर विपरित परिणाम होईल, त्यामुळे महाविकास आघाडीला बंद पाळण्यास मनाई करावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती. या निर्णयानंतर शरद पवारांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करून बंद मागे घेण्याचे आवाहन केले. तर काँग्रेसने नेते नाना पटोले यांनी देखील महाविकास आघाडीकडून बंद मागे घेत असल्याचे सांगितले.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.