
Tej Police Times
लाभार्थी महिलांची संख्या किमान अडीच कोटींपर्यंत नेण्याचा राज्य सरकारचा मानस असून त्यादृष्टीने अधिकाधिक महिलांना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या वाढत्या संख्येविषयी महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनीही माहिती दिली. महाराष्ट्रातील २ कोटी ३ लाख ९४ हजार ९२४ महिलांनी योजनेसाठी अर्ज केला आहे. अर्जांची छाननी युद्धपातळीवर सुरू असून, प्रत्येक पात्र महिलेस लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे. विभागाकडून आधीच स्पष्ट करण्यात आले आहे की, आता पुढे ज्या महिला अर्ज करतील आणि योजनेसाठी पात्र ठरतील त्यांना जुलैपासूनचे सर्व हप्ते थेट बँक खात्यात मिळतील, असे त्या म्हणाल्या.
लेखकाबद्दलयोगेश बडे योगेश बडे हे ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नागपूर आवृत्तीत सीनियर डिजिटल कंटेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. गेल्या २० वर्षांपासून ते पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, सामाजिक, शेतकरी आत्महत्या, विदर्भाचे आंदोलन या विषयावर ते लिखाण करतात…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.