
Tej Police Times
Parbhani Rain : मागील २४ तासांत परभणीत मुसळधार; जनजीवन विस्कळीत, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर
परभणी जिल्ह्यात मागील तीन महिन्यांमध्ये जवळपास ५९२ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. त्या तुलनेत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत ५६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परभणी जिल्ह्यात नऊ तालुके येतात. त्यापैकी गंगाखेड, पालम, सोनपेठ आणि जिंतूर या तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. गंगाखेडमध्ये १३० मिलिमीटर, जिंतूर १०३, पालम ११०, सोनपेठ १२२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर परभणी ७९, पाथरी ८७, पूर्ण ८३, सेलू ८८ आणि मानवत ८९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
मागील वर्षी आत्तापर्यंत केवळ ३३६ मिलिमीटर पाऊस झाला होता, तो सरासरीच्या फक्त ५६ टक्के एवढा होता. त्यातुलनेने यावर्षी परभणी जिल्ह्यामध्ये चांगला समाधानकारक पाऊस झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील येलदरी, लोअर दूधना हे प्रकल्प अद्यापही भरले नाहीत. असाच मुसळधार पाऊस आणखीन दोन ते तीन दिवस राहिला, तर मात्र परभणी जिल्ह्यातील छोटे-मोठे प्रकल्प भरून ओसंडून वाहतील अशी परिस्थिती आहे.
Badlapur Case Update : पीडित मुलींनी ओळख परेडमध्ये आरोपी अक्षय शिंदेला ओळखलं, काठी वाला दादा म्हणत…
शनिवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून परभणी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. तो अद्यापही तसाच सुरू आहे. जवळपास ४० मिलीमीटर पावसाची नोंद मागील २० तासामध्ये झाली आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे पाणी शेताबाहेर निघाले आहे. शहरांमध्ये मात्र सकल भागात पाणी साचत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन मात्र सतर्क असून याकडे लक्ष देऊन आहे.
परभणी जिल्ह्यासह हिंगोली, जालना, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि पाऊसही तसाच कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असा खबरदारीचा इशाराही देण्यात आला आहे. हा हवामानाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून देण्यात आला आहे.
Nanded News : नांदेडमध्ये पावसाचं थैमान, अनेक भागात पाणी साचलं; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुदगल उच्च पातळी बंधारा रविवारी ९७ टक्के क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे आणि बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता मुदगल बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडण्याची शक्यता आहे.
प्रकल्पीय पाणीसाठा क्षमता (दलघमी)*
– मृत पाणीसाठा – १२४.६७०
– जिवंत पाणीसाठा – ८०९.७७०
– एकूण पाणीसाठा – ९३४.४४०
गंगाखेड तालुक्यातील मासोळी या मध्यम सिंचन प्रकल्पात आज सकाळी आठ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाल्याने, पाणी साठ्यात ८१५.३० मीटर एवढी वाढ झाली. सद्यस्थितीत या प्रकल्पात २१६०६ दलघमी म्हणजे १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. नदीच्या वरच्या भागातून पाण्याची आवक सुरूच आहे, त्यामुळेच तुडुंब भरलेल्या या प्रकल्पातून कोणत्याही क्षणी धरणाच्या खालील नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जाईल, अशी माहिती जलसिंचन विभागाच्या शाखा अभियंत्यांनी दिली. दरम्यान महसूल प्रशासनाने नदीपात्रावरील इसाद, कौडगाव, माळीसगाव, गोपा, वाघळगाव या गावच्या ग्रामस्थांना राहण्यासंदर्भात इशारा दिला आहे.
लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.