
Tej Police Times
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता, तर तो मजबूत झाला असता, असं नितीन गडकरी फिक्कीच्या कार्यक्रमात म्हणाले. ‘मी जेव्हा मुंबईत ५५ उड्डाणपूल बांधत होतो, तेव्हा एका व्यक्तीनं मला मूर्ख बनवलं होतं. त्यानं लोखंडाला हिरव्या रंगाचा मुलामा दिला आणि या लोखंडाला गंज लागणार नाही असं सांगितलं. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण त्या लोखंडाला गंज लागला. त्यामुळे समुद्रापासून ३० किलोमीटरच्या अंतरापर्यंतच्या कामांसाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही,’ असं गडकरी यांनी म्हटलं. १९९५ ते १९९९ या कालावधीत राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं. त्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यावेळचा अनुभव गडकरींनी फिक्कीच्या कार्यक्रमात सांगितला.
Maharashtra Assembly Election: हवी विधानसभेची जागा, पण अडथळा ठरताहेत दादा; भाजप, राष्ट्रवादीत ‘२१ अनपेक्षित’, संघर्ष तीव्र
‘आता तुम्ही मुंबईतील परिस्थिती पाहा. कितीही चांगलं काम करा. समुद्राच्या जवळ ज्या इमारती आहेत, त्यांना लवकर गंज लागतो. त्यामुळे समुद्रापासून ३० किलोमीटरच्या आत बांधकाम करताना तिथे स्टेनलेस स्टीलचाच वापर व्हायला हवा, असं माझं मत आहे,’ असं नितीन गडकरी म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ नेते शरद पवारांनी गडकरींच्या कामाचं कौतुक केलं. ‘गडकरी कोणतंही काम करताना ते अतिशय तळमळीनं आणि झोकून देऊन करतात. त्यांनी केलेल्या कामांचा दर्जाही चांगला असतो,’ अशा शब्दांत पवारांनी गडकरींचं कौतुक केलं.
Maharashtra Vidhan Sabha Elections: फडणवीसांचा इलाका, मविआचा धमाका; भाजपच्या बालेकिल्ल्याला आणखी तडे? चिंता वाढवणारा सर्व्हे
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे असो वा कोल्हापूर-बेळगाव रस्ता असो, गडकरींनी अनेक चांगले रस्ते बांधले. त्यांनी संपूर्ण देशभरात काम केलं आहे. आताही त्यांच्या विभागाकडून देशात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरु आहेत. रस्ते उभारणीत गडकरींचं मोठं योगदान आहे. मी संसदेतही याबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही, असं म्हणत पवारांनी गडकरींवर स्तुतीसुमनं उधळली.
…तर पुतळा कोसळला नसता, गडकरींनी सांगितली गंभीर चूक; पवारांकडून ‘रोडकरीं’च्या कामाचं कौतुक
नितीन गडकरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन काही बोलले असतील, तर त्यांनी तज्ज्ञांशी बोलूनच मत व्यक्त केलेलं असेल, असं पवार म्हणाले. शिवरायांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळला असल्याचा आरोप पवारांनी केला. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. विरोधकांनी यावरुन सरकारला सातत्यानं लक्ष्य केलं आहे.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.