
Tej Police Times
वातावरणात सतत बदल होताना दिसत आहेत. मात्र दोन दिवसांपासून महाराष्ट्रभरात पावसाने उघडीप घेतली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शनिवारपासून पुढे चार दिवस महाराष्ट्रभरातील जवळपास सर्वच भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढेल, तसेच घाटावरही येत्या चार दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल.
मराठवाडा, विदर्भात पावसाची स्थिती कायम राहणार असून, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय परभणी, धाराशिव जिल्ह्यांमध्येही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बीड, हिंगोली, तसेच छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्येही मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Rain Alert: पुढील चार दिवस पावसाचे, मुंबई-नाशकात जोरदार सरी, पुण्याला ऑरेंज अलर्ट, मराठवाडा-विदर्भातही धो-धो
मुंबई, पुण्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून पुण्याला शनिवारी ऑरेंज लर्ट देण्यात आला होता. शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. पुण्यासह रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.