तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Pitru Paksha Puja Samagri List 2024: पितृपक्षात पितरांचे पिंडदान करताय? जाणून घ्या तर्पण आणि श्राद्ध विधीसाठी लागणारे साहित्य…

0 51

Pitru Paksha Puja Samagri: भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेनंतर पितृपक्ष सुरु होतो. या काळात पिडंदान, तर्पण विधी आणि श्राद्ध केले जाते. असे म्हटले जाते या काळात पूर्वज पृथ्वी लोकावर येतात. भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात झाली असून हा काळ सर्वपित्री अमावस्येपर्यंत सुरु राहिल. जाणून घेऊया तर्पण आणि श्राद्ध विधीसाठी लागणारे साहित्य.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Pitru Paksha Puja Sahitya In Marathi :

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेनंतर पितृपक्ष सुरु होतो. या काळात पिडंदान, तर्पण विधी आणि श्राद्ध केले जाते. असे म्हटले जाते या काळात पूर्वज पृथ्वी लोकावर येतात.

यामध्ये श्राद्ध विधी आणि तर्पण करणे महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय पितरांसाठी दान करणे देखील शुभ मानले जाते. भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात झाली असून हा काळ सर्वपित्री अमावस्येपर्यंत सुरु राहिल. जाणून घेऊया तर्पण आणि श्राद्ध विधीसाठी लागणारे साहित्य.

पितृपक्षात श्राद्ध करताना लागणारे साहित्य

तीळ – पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तीळ महत्त्वाचे मानले जाते.
दर्भ – दर्भ हे पवित्र आहे जे श्राद्धात विशेष वापरले जाते.
पाणी – तर्पण पाण्याने केले जाते.
गंगाजल – गंगाजल पवित्र मानले जाते आणि श्राद्धात विशेष महत्त्व दिले जाते.
दूध – तर्पणमध्येही दूध वापरले जाते.
दही – श्राद्धातही दही वापरतात.
तूप – अर्पण करण्यासाठी तुपाचा वापर केला जातो.
मध – श्राद्धात मधाचाही समावेश आहे.
फळे – केळी, आंबा, सफरचंद इत्यादी विविध प्रकारची फळे श्राद्धात अर्पण केली जातात.
मिठाई – श्राद्धात लाडू, पेढे इत्यादी विविध प्रकारची मिठाई अर्पण केले जाते.
अन्न – तांदूळ, गहू शिजवून श्राद्धाच्या वेळी पितरांना अर्पण केले जातात.
पिंड – पिंड हा गव्हाच्या पिठापासून बनवला जातो आणि पूर्वजांना अर्पण केला जातो.
दिवा – दिवा लावून पितरांना प्रकाश दिला जातो .
धूप – धूप जाळून पितरांना अर्पण केले जाते.
नारळ – श्राद्धात नारळही अर्पण केला जातो.
कापूर – श्राद्धातही कापूर जाळला जातो.
फुले – श्राद्धातही फुले अर्पण केली जातात .

श्राद्ध करताना पितरांच्या नावाचे स्मरण करुन पितरांसाठी नैवेद्य दाखवावा. तसेच पितृपक्षादरम्यान पिंडदान करा आणि श्राद्ध विधी करा. ब्राह्मणांना अन्नदान करा. याशिवाय दानधर्म करा.

पितृपक्षाचा हा काळ महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये पूर्वजांचे स्मरण केले जाते तसेच त्यांना या काळात श्रद्धांजली अर्पण करतात. याला महालय आणि पितृपक्षाचा पंधरवडा असे म्हणतात. या काळात आपल्या नातेवाईकांचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल, त्या नातेवाईकाचे श्राद्ध, पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची परंपरा आहे. या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात- अज्ञात अशा सर्वांचे पिंडरुपाने पूजन केले जाते.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.