Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फडणवीसांनी कौशल्याने मिटविला काळे-कोल्हे संघर्ष; आता महाविकास आघाडीची मोठी अडचण, दुसरा उमेदवार शोधण्याची वेळ

4

Maharashtra Election 2024: कोपरगाव मतदारसंघातील कोल्हे विरुद्ध काळे हा संघर्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्याने मिटविला असून यामुळे आता महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स

अहिल्यानगर (विजयसिंह होलम) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत दाखल झाल्यानंतर राज्यातील काही मतदारसंघात उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. त्यापैकीच अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघाचा समावेश येतो. येथे काळे-कोल्हे यांच्यातील संघर्ष तिसऱ्या पिढीपर्यंत आला. या विधानसभा निवडणुकीत त्याचा फाटका महायुतीला बसण्याची शक्यता होती. मात्र, भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या कौशल्याने परिस्थिती हातळली. माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि इच्छुक उमेदवार विवेक कोल्हे यांना थेट दिल्लीपर्यंत नेले. वरिष्ठ नेत्यांसोबतची चर्चा आणि मिळालेला शब्द यामुळे कोल्हेंचे बंड शमले आहे. यामुळे कोपरगावसह शेजारील एक दोन मतदारसंघात महायुतीला बसणारा फटकाही टळला आहे. एवढेच नव्हे तर कोल्हे यांच्या भरवशावर गेल्या अनेक महिन्यांपासून अवलंबून असलेल्या महाविकास आघाडीला आता दुसरा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे यांनी पराभव केला होता. तेव्हापासून विवेक कोल्हे आईच्या पराभवाचा वचपा काढण्याची तयारी करीत होते. कोल्हे यांचे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशीही फारसे सख्य नव्हते. त्यामुळे तालुक्याती गणेश सहकारी साखर कारखान्यात कोल्हे यांनी सत्ता मिळविली. विखेंच्या विरोधात कोल्हे आहेत म्हटल्यावर त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची साथ मिळाली. कारखाना जिंकल्यावर कोल्हेंनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविली. तेथे त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही. तेथे त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी काळे यांच्या विरोधात विधानसभा लढविण्याची तयारी केली. मात्र, महायुतीच्या जागा वाटपात ही जागा काळे यांनाच जाणार असल्याचे लक्षात आल्यावर कोल्हे यांनी महाविकास आघाडीकडे संपर्क सुरू केला. महाविकास आघाडीलाही कोल्हे यांच्या रुपाने कोपरगावमध्ये सक्षम उमेदवार मिळत असल्याने तेही स्वागतच करत होते. जागा ज्या पक्षाला जाईल, तेथून कोल्हे यांनी लढावे, अशा चर्चाही झाल्या होत्या.
Maharashtra Election 2024: शरद पवारांचा पक्ष फुटला आणि प्रवीण मानेंनी उमेदवारी अर्ज भरला; अखेर इंदापूरला बंडाळीची धग!
महायुतीच्या दृष्टीने हे अडचणीचे ठरणार होते. केवळ कोपरगावच नव्हे तर परिसरातील आणखी काही मतदारसंघात कोल्हे यांचा संपर्क आहे. तेथेही फटका बसला असता. त्यामुळे फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घातले. प्रथम त्यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी कोल्हे यांची चर्चा घडवून आणली. कोल्हे यांना विधानसभा लढू नये आणि पक्ष सोडू नये, अशी गळ घालण्यात आली. त्यासाठी केंद्रात स्थान देण्याचा शब्दही देण्यात आला. एवढ्यावरच न थांबता कोल्हे मायलेकाला दिल्लीला घेऊन जात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतही बैठक घडवून आण्यात आली. थेट शहा यांची भेट आणि मिळालेला शब्द यामुळे कोल्हे यांचे समाधान झाले. त्यांनी या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला.
माहीममधून अमित ठाकरे विजयी झाल्यास इतिहास घडणार, असं काय दडलंय या मतदारसंघात; थेट बाळासाहेबांशी कनेक्शन
यामुळे आता आमदार काळे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला दुसरा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. फडणवीस यांनी यात आणखी एक संधी साधली आहे. लोकसभा निवडणुकीत यावेळी नगरच्या दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे गेल्या आहेत. त्यामुळे येथे भाजप किंवा महायुतीला केंद्रात प्रतिनिधीत्व उरलेले नाही. कोल्हे यांना केंद्रात स्थान दिले तर ती उणीवही भरून काढता येईल. यापूर्वी ही हे स्थान विखे पाटील यांच्याकडे होते, आता कोल्हे यांच्याकडे जाईल. त्यामुळे कोल्हे यांना माघार घेऊनही जिंकल्याचा अनुभव आल्यासारखे आहे. अर्थात निवडणुकीच्या काळात दिलेला हा शब्द भाजपच्या नेतृत्वाकडून पूर्ण होणार का? याचीही चर्चा आहेच.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.