
Tej Police Times
‘भारत जोडो’ हा जो एक समूह तयार करण्यात आला आहे. या समूहामध्ये अशा अनेक संघटना आहेत, ज्या अतिशय डाव्या विचारांच्या आहेत. ज्यांची ध्येय धोरणे पाहिली, त्यांच्या कामाची पद्धत पाहिली ती अराजक पसरवणारी व्यवस्था असल्याचे फडणवीस म्हणाले.
एका बाजूला राहुल गांधी सर्वांना एक पुस्तक दाखवतात. संविधानाचा सन्मान केला पाहीजे. मग लाल संविधानच का? तुम्ही कोणाला इशारा देताय? लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारे दिले जात आहेत. तुम्ही अराजक पसरवत आहात. संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्या लोकांना एकत्रित करून समाजात विद्वेष आणि अराजकता तयार करण्याचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Donald Trump Win : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने भारताला होणार तोटा; या पाच गोष्टींवर थेट परिणाम होऊ शकतो
अर्बन नक्षलवाद हा यापेक्षा वेगळा नाही असे सांगत फडणवीस पुढे म्हणाले. अर्बन नक्षलवाद म्हणजे लोकांची मने दूषित करायची, त्यांच्या मनात अराजकतेचे विचार आणायचे जेणेकरून देशातील ज्या व्यवस्था आहेत, संस्था आहेत त्यावरील विश्वास उडेल आणि देशातील एकतेला, एकात्मतेला धोका निर्माण होईल, असे काम राहुल गांधी यांच्या माध्यमातून होत आहे.
काल ५ नोव्हेंबर रोजी महायुतीने कोल्हपूरात प्रचाराचा नारळ फोडला. या वेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीचा उल्लेख केला होता. यावरून फडणवीसांनी त्यांचा समाचार घेतला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० मोठी आश्वासने दिली. ज्यात पोलिस दलात महिलांची भरती, शेतकऱ्यांची कर्ज माफी, लाडकी बहिण योजनेतील रक्कम २ हजार रुपये करणे आदी आश्वासनांचा समावेश होता. आता फडणवीसांनी अर्बन नक्षलवादावरून केलेल्या आरोपवरून निवडणुकीच्या काळात राजकारण पेटणार असल्याचे दिसते.
लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.