
Tej Police Times
राज्याचा माजी राज्यमंत्री पवार साहेबांबद्दल जे खालच्या पातळीवर वक्तव्य केले आहे. या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध आणि धिक्कार व्यक्त करतो. सदाभाऊ खोत यांनी पवार पवार साहेबांची आणि राज्याची माफी मागावी. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं, तेही ऐन निवडणुकीच्या तोंडावर मला असं वाटतं की यामागे काहीतरी षडयंत्र असू शकते. याचा बोलवता धनी दुसरा कोणी आहे का? असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. बारामतीच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधतान ते बोलत होते. लोकशाहीत वेगवेगळ्या प्रकारे टीका होऊ शकतात. मात्र पवार साहेबांसारख्या नेत्यावर बोलणं. हे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे असे मी मानतो, असंही पाटील म्हणाले.
पवारांबाबत जीभ घसरली, अजित दादांनी फोनवरुन खोतांना खडसावलं, म्हणाले सदाभाऊ पुन्हा जर…
माझ्या सत्तेच्या काळात ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही ठराविक कार्यकर्त्यांना उचलून आणलं, त्यांना पद दिली. निवडून आणण्यासाठी पराकाष्टा केली, मानसन्मान दिला. तालुक्यात नावलौकिक केले. १० वर्षे त्यांना पदे दिली, हे सगळं दिल्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोडून जाणं हे त्यांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. यातले काही माझा प्रचार करत करत त्यांनी काल प्रवेश केल्याचंही पाटील यांनी सांगितलं.
काहींनी पाठिंबा देत देत प्रवेश केला. तर काही लोक आदल्या दिवशी माझ्याबरोबर मीटिंगमध्ये होते. असं काय घडलं. हर्षवर्धन पाटलांनी काय अन्याय केला? असे म्हणत मला तालुक्यात एकटे पाडण्याचा प्रयत्न केलाय जातोय. जसं पवार साहेबांना टार्गेट करून एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला. तसंच माझ्या बाबत तालुक्यात प्रयत्न असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.